शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

निवडणूक कामास बीएलओंचा नकार

By admin | Updated: September 17, 2014 23:47 IST

अधिकाऱ्यांकडून कानउघडणी : घरोघरी जावे लागणार

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून आम्हीच काम करायचे का, असा सवाल व मतदानाच्या दिवशी साधे पाणीही पाजत नसल्याची तक्रार करत विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) निवडणुकीचे काम करण्यास नकार दिला. तक्रारीच्या सुरात सर्वांनीच सूर मिसळविल्याने काहीसे वातावरण तंग झाले; परंतु त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला जाब विचारून कानउघडणी केल्याने अखेर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील बीएलओंची बैठक तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश राठोड यांनी बोलावली होती. बीएलओ म्हणून प्रामुख्याने महापालिकेच्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, बैठकीला सुरुवात होताच एका बीएलओने तक्रार करायला सुरुवात केली. आमच्या शाळेत नऊ शिक्षकांपैकी सहा ते सात शिक्षकांना बीएलओचे काम सोपविण्यात आले, मग शाळा कशी चालवायची, असा सवाल करताच त्यांच्या सुरात बाकींच्यानीही सूर मिसळला. याद्यातील चुकांमुळे मतदारांचे पत्ते व घरे सापडत नाहीत, नागरिक व्यवस्थित माहिती न देता अपमानास्पद वागणूक देतात, अशी तक्रार करण्यात आली. मतदारांचे ओळखपत्र वाटप हे काम बीएलओंचे नसल्याचेही काहींनी सांगितले, तर काहींनी मतदानाच्या दिवशी दिवसभर उन्हातान्हात बसवून ठेवल्यावर साधी पाण्याचीही व्यवस्था प्रशासनाने केली नाही, अशी तक्रार केली. या साऱ्या तक्रारींशी सर्वच बीएलओ सहमत झाल्याने त्यांनी गलका करायला सुरुवात केली. अखेर तहसीलदार राठोड यांनी निवडणुकीची कामे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे असल्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत करावीच लागतील, असे सांगितले. तक्रार करणाऱ्या बीएलओ शिक्षकाच्या आजवर केलेल्या कामाचा आढावा घेण्यास राठोड यांनी सुरुवात करताच त्याची बोबडी वळाली. त्यानंतर मात्र सर्वांनी तक्रारीचा सूर बदलत शंका-समाधान करून घेतले. (प्रतिनिधी)