गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील राजाराम-खांदला गावासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी डेपोची बसफेरी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती, परंतु राजाराम-खांदला रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून गोलाकर्जी-राजाराम-कमलापूर-रेपनपल्ली या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. सदर मार्गांचे काम पूर्ण झाले, परंतु लाॅकडाऊन घोषित झाल्यापासून राज्यात पूर्णतः बस फेऱ्या बंद करण्यात आल्या तेव्हापासून राजाराम-खांदला बसफेरी बंद आहे. ही बसफेरी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे. बसफेरी बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येतात तसेच त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागताे. ६ किमी पायपीट करुन गाेलाकर्जी येथे यावे लागते. त्यानंतर पुढचा प्रवास करावा लागताे. त्यामुळे यामार्गे बसफेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पं.स. सभापती भास्कर तलांडे यांनी अहेरीच्या आगार व्यवस्थापाकांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना ॲड. एच. के. आकदर,अशोक येलमुले, श्रीनिवास राऊत, पुनेश कंदीकुरवार, संजय गोंडे उपस्थित होते.
राजाराम-खांदला बसफेरी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST