शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

पोलिसांच्या श्रमदानातून तलावाचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

एटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी येथील गाव तलावात कित्येक वर्षापासून मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गाव तलावाचे खोलीकरण केले. पोकलॅन्ड, जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपसा करून तलावाचे खोलीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देपरसलगोंदीच्या तलावाचे रूप पालटले : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, मत्स्य शेतीतून मिळणार स्थानिकांना रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी नावीण्यपूर्ण योजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून हेडरी उपविभागाअंतर्गत आलदंडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील परसलगोंदी येथील गावतलावाचे श्रमदानातून खोलीकरण करण्यात आले. आता या तलावाचे रूप पालटले असून सिंचन सुविधा निर्माण होणार आहे.एटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी येथील गाव तलावात कित्येक वर्षापासून मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गाव तलावाचे खोलीकरण केले. पोकलॅन्ड, जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपसा करून तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तलावातील मुरूम गावातील अंतर्गत मार्गावर टाकून रस्ता दुरूस्तीचे काम करण्यात आले. तसेच तलावातील गाळ शेतक्यांच्या शेतामध्ये टाकल्यामुळे शेती उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.सदर तलावात पावसाचे पाणी साचल्यानंतर गडचिरोली पोलीस दलातर्फे स्थानिक बांधवांना मत्स्यबिज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मत्स्य शेतीच्या माध्यमातून या भागातील अनेक तरूणांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.तलाव खोलीकरण उपक्रमासाठी एसडीपीओ संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ १११ बटालियनचे पोलीस निरीक्षक ठाकरे, हेडरीचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, संदेश नाळे, अमित पाटील, अजित मोरे, विनायक माहुरकर, सोपान मुंडे, महेश सातपुते, किरण मगदूम, गोपाल इंद्राळे, राहुल वानखेडे व कर्मचाºयांनी सहकार्य केले.पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात राबविणार उपक्रमएटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी येथील तलावाचे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी श्रमदानातून तसेच यंत्राच्या सहाय्याने खोलीकरण केले. त्यामुळे मत्स्य शेती व सिंचन सुविधेला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील बºयाच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. सदर उपक्रम हा जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस