शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

जोगीसाखरात तीव्र पाणी टंचाई

By admin | Published: June 13, 2014 12:09 AM

येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या

जोगीसाखरा : येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी आणून नागरिक आपली तहान भागवितात. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने कामाचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.भर उन्हाळ्यात नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम काही दिवसापासून सुरू आहे. परंतु काम सुरू केल्यानंतर आठ ते दहा दिवस नळाचे पाणी कायमचे बंद करण्यात आले होते. लोकमतमध्ये पाणी टंचाईसंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच घागरमोर्चा निघेल या भीतीने नदीचे वाहते दुषित पाणी नळामार्फत गावात सोडले गेले. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नव्हते. नदीचे नळामार्फत सोडलेले पाणी पिण्यास वापरू नये, अशी दवंडी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत देणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक नागरिकांनी दुषित पाण्याचा वापर केल्याने किरकोळ आजार किंवा साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नळामार्फत गढूळ पाण्याचा पुरवठा करून नागरिकांना शांत करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने प्रयत्न केला. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांनी पाण्याचा वापर करणे टाळले. त्यामुळे गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी पिण्यासाठी नागरिकांना आणावे लागत आहे. गावातील अनेक नागरिक नदीतील चुव्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करीत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जोगीसाखरा येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात टंचाई असते. याची जाणीव ग्रामपंचायत प्रशासनाला असतांनाही ऐन उन्हाळ्यात वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने का सुरू केले,असा प्रश्नही गावकरी करीत आहेत. जोगीसाखरा येथील लोकसंख्या ३ हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे गावात असलेले पाण्याचे स्त्रोत अत्यल्प प्रमाणात आहेत. गावात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाईची समस्या कधी सुटणार, असा सवालही गावातील नागरिक प्रशासनाला करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन त्वरित सोडवावी, अशी मागणी जोगीसाखरा येथील नागरिकांंकडून केली जात आहे. (वार्ताहर)