शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

व्यवस्थापन वने ग्रामवन घोषित

By admin | Updated: August 16, 2014 23:30 IST

भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरिता देण्यात आली आहेत. ती वने ग्रामवन म्हणून व्यवस्थापनाकरिता

शासनाचा निर्णय : अभिहस्तांकित करण्यास मिळाली मान्यतागडचिरोली : भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरिता देण्यात आली आहेत. ती वने ग्रामवन म्हणून व्यवस्थापनाकरिता महसूल व वनविभाग यांना अभिहस्तांकित करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. गावांना हक्क मिळवून देण्याकरिता वनविभागाने पुढाकार घेतला असून वनविभागातील कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन सर्व लोकांना माहिती देत आहेत. परंतु जोपर्यंत ग्रामवन नियम लागू करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर होत नाही. तोपर्यंत ग्रामवन म्हणून घोषित करता येत नाही. तसेच पुढील १० वर्षाकरिता सूक्ष्म आराखडा तयार करण्याची प्रक्रियाही करता येत नाही. ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामवन वनव्यवस्थापन समिती तयार करण्याची कार्यवाही करता येऊ शकते. ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यास शासन निर्णयातील शून्य अतिक्रमण, नैसर्गिक पुनरूत्पादनात वाढ, आदीच्या क्षेत्राचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी, वनीकरणातील जीवंत रोपांचे प्रमाण कमी-कमी ६० टक्के, चराईबंदी, कुऱ्हाड बंदी याची प्रभावी अंमलबाजवणी करण्याची अटी ठेवण्यात आली आहे. यापैकी कमीत कमी तीन अटी पूर्ण करीत असल्यासच ग्रामवन म्हणून घोषित केले जाणार आहे. काही अशासकीय संस्थांनी ग्रामवन घोषित करण्याकरिता वनविभागातील कर्मचारी, गावकऱ्यांवर दबाव टाकून ठराव मंजूर करीत असल्याचा भ्रम पसरविला होता. मात्र शासन निर्णयाचे पालन करीत आहे. याबाबत गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आमिष दाखविले जात नाही, असे गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी म्हटले आहे.