शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन वने ग्रामवन घोषित

By admin | Updated: August 16, 2014 23:30 IST

भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरिता देण्यात आली आहेत. ती वने ग्रामवन म्हणून व्यवस्थापनाकरिता

शासनाचा निर्णय : अभिहस्तांकित करण्यास मिळाली मान्यतागडचिरोली : भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरिता देण्यात आली आहेत. ती वने ग्रामवन म्हणून व्यवस्थापनाकरिता महसूल व वनविभाग यांना अभिहस्तांकित करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. गावांना हक्क मिळवून देण्याकरिता वनविभागाने पुढाकार घेतला असून वनविभागातील कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन सर्व लोकांना माहिती देत आहेत. परंतु जोपर्यंत ग्रामवन नियम लागू करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर होत नाही. तोपर्यंत ग्रामवन म्हणून घोषित करता येत नाही. तसेच पुढील १० वर्षाकरिता सूक्ष्म आराखडा तयार करण्याची प्रक्रियाही करता येत नाही. ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामवन वनव्यवस्थापन समिती तयार करण्याची कार्यवाही करता येऊ शकते. ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यास शासन निर्णयातील शून्य अतिक्रमण, नैसर्गिक पुनरूत्पादनात वाढ, आदीच्या क्षेत्राचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी, वनीकरणातील जीवंत रोपांचे प्रमाण कमी-कमी ६० टक्के, चराईबंदी, कुऱ्हाड बंदी याची प्रभावी अंमलबाजवणी करण्याची अटी ठेवण्यात आली आहे. यापैकी कमीत कमी तीन अटी पूर्ण करीत असल्यासच ग्रामवन म्हणून घोषित केले जाणार आहे. काही अशासकीय संस्थांनी ग्रामवन घोषित करण्याकरिता वनविभागातील कर्मचारी, गावकऱ्यांवर दबाव टाकून ठराव मंजूर करीत असल्याचा भ्रम पसरविला होता. मात्र शासन निर्णयाचे पालन करीत आहे. याबाबत गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आमिष दाखविले जात नाही, असे गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी म्हटले आहे.