शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

जीवंत तारांच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:14 IST

मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत.

ठळक मुद्देमक्यासाठी गेला जीव? : मुलचेरातील घटना

मुलचेरा : मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली.रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत. रमेश व दौलत हे दोघेही बुधवारच्या रात्रीपासूनच गायब होते. मात्र होळीचा सण असल्याने एखाद्या ठिकाणी गेले असावे, असा अंदाज घरच्यांनी बांधला. त्यामुळे रात्रभर त्यांची शोधाशोध केली नाही. मात्र गुरूवारी सकाळीही ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध घेतली असता, दोघांचेही मृतदेह रणजीत हलदार यांच्या शेतात आढळून आले.हलदार यांनी वन्यजीवांपासून मक्याच्या पिकाच्या संरक्षणासाठी शेतासभोवताल तारेचे कुंपन लावले होते. या कुंपनाला त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता. दोघांचाही तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेतमालक रणजित हलदार व जयदेव हलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांच्याही विरोधात भादंवि कलम ३०४/३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश आत्राम याला पत्नी, आई-वडील व दोन मुली आहेत. आई-वडील वयोवृध्द आहेत. दौलत मडावी याला मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रंगपंचमीच्या दिवशी गावात घटना घडल्याचे उघडकीस आल्याने गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, दोघेही जनावरे शोधण्यासाठी गेले होते, अशी माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र मक्याच्या शेतीत रात्री १० वाजता दोघेही गेल्याने ते मक्याची कणसे चोरण्यासाठी गेले असावेत अशी चर्चा गावकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा तेवढ्या रात्री शेतात जाण्याचे दुसरे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शोधमोहिमेचा महावितरणला विसरकुंपनाला विजेचा प्रवाह सोडल्याने वन्यजीवांचा मृत्यू होतो. हे प्रकार थांबविण्यासाठी महावितरणने मागील वर्षी शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम काही दिवसांचा फार्स ठरली. यावर्षी मात्र शोधमोहीम राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. याचा गैरफायदा शेतकऱ्यांकडून घेतला आहे. शेतकºयांनी पिकांच्या संरक्षणाकरिता खुलेआम विद्युत प्रवाह सोडण्यास सुरूवात केली आहे.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी