शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जीवंत तारांच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:14 IST

मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत.

ठळक मुद्देमक्यासाठी गेला जीव? : मुलचेरातील घटना

मुलचेरा : मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली.रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत. रमेश व दौलत हे दोघेही बुधवारच्या रात्रीपासूनच गायब होते. मात्र होळीचा सण असल्याने एखाद्या ठिकाणी गेले असावे, असा अंदाज घरच्यांनी बांधला. त्यामुळे रात्रभर त्यांची शोधाशोध केली नाही. मात्र गुरूवारी सकाळीही ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध घेतली असता, दोघांचेही मृतदेह रणजीत हलदार यांच्या शेतात आढळून आले.हलदार यांनी वन्यजीवांपासून मक्याच्या पिकाच्या संरक्षणासाठी शेतासभोवताल तारेचे कुंपन लावले होते. या कुंपनाला त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता. दोघांचाही तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेतमालक रणजित हलदार व जयदेव हलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांच्याही विरोधात भादंवि कलम ३०४/३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश आत्राम याला पत्नी, आई-वडील व दोन मुली आहेत. आई-वडील वयोवृध्द आहेत. दौलत मडावी याला मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रंगपंचमीच्या दिवशी गावात घटना घडल्याचे उघडकीस आल्याने गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, दोघेही जनावरे शोधण्यासाठी गेले होते, अशी माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र मक्याच्या शेतीत रात्री १० वाजता दोघेही गेल्याने ते मक्याची कणसे चोरण्यासाठी गेले असावेत अशी चर्चा गावकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा तेवढ्या रात्री शेतात जाण्याचे दुसरे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शोधमोहिमेचा महावितरणला विसरकुंपनाला विजेचा प्रवाह सोडल्याने वन्यजीवांचा मृत्यू होतो. हे प्रकार थांबविण्यासाठी महावितरणने मागील वर्षी शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम काही दिवसांचा फार्स ठरली. यावर्षी मात्र शोधमोहीम राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. याचा गैरफायदा शेतकऱ्यांकडून घेतला आहे. शेतकºयांनी पिकांच्या संरक्षणाकरिता खुलेआम विद्युत प्रवाह सोडण्यास सुरूवात केली आहे.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी