शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

प्राणहिता नदीतून नावेने धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:17 IST

तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशॉर्टकट मार्ग म्हणून होतो वापर : ६० किमीचा फेरा व प्रवासी भाडे वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.महाराष्टÑ व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा मोठा पूल गोदावरी नदीवर बांधण्यात आला व या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या बसगाड्या गोदावरी नदीच्या पुलावरून आवागमन करीत आहेत. उन्हाळा व हिवाळ्यात सिरोंचा-कालेश्वर-पलगुला नजीक गोदावरी नदीपात्रात कच्चा रस्ता होता. त्यावेळी तेलंगणातील चिन्नूर, मंचेरियलकडे लोक बसने जात असायचे. मात्र आता पावसाळ्यात नदी दुथळी भरून वाहत असल्याने येथून रस्ता राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात बसने जायचे असेल तर महादेवपूरवरून बसने मंचेरियलकडे जाता येते. मात्र हा ६० किमीचा फेरा होतो. या मार्गे प्रवास केल्यास तिकीटापोटी प्रवाशांवर आर्थिक भूर्दंडही पडत असते. त्यामुळे बरेच नागरिक बसच्या मार्गाने न जाता सिरोंचाजवळील प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. तेलंगणाच्या सिमेवरील अर्जुनगट्टा गावातून तेलंगणाच्या बसने पुढे अनेक लोक जातात. सिरोंचा-चेन्नूर हे ३० किमीचे अंतर आहे. तसेच चेन्नूर ते मंचेरियल हे ३५ किमीचे अंतर आहे.सिरोंचा - चेन्नूरदरम्यान रापनपेल्ली, बक्कलचेलका, देवलाडा, रामपूर, पारपेल्ली, येरोपपेट्टा, चिंतलपल्ली आदी गावे पडतात. या सर्व गावातील रहिवासी नागरिक नावेचा प्रवास करून सिरोंचा मुख्यालयी पोहोचतात. प्राणहिता नदीवर धर्मपुरी गावाजवळ निर्माणाधिन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना नावेचा प्रवास पूर्णत: बंद होणार आहे.सध्या सिरोंचावरून मंचेरियलला बसने जायचे असल्यास सिरोंचा-कालेश्वर-महादेवपूर, काठाराम, मंचनी, गोदावरी, खनी येथून मंचेरियलला पोहोचता येते. मात्र या मार्गे ६० किलोमीटर अंतराचा अधिकचा फेरा मारावा लागतो. सदर मार्गे प्रवास केल्यास एकूण १२५ किमीचे अंतर गाठावे लागते. सिरोंचा नजीकच्या प्राणहिता नदीवरून अर्जूनगुट्टावरून बसने ६५ किमीचे अंतर गाठावे लागते. सदर अधिकचे अंतर कापणे आर्थिकदृष्ट्या या भागातील नागरिकांना परवडत नसल्याने सिरोंचा तालुक्यातील व सिरोंचा पलीकडचे तेलंगणा राज्यातील अनेक लोक नदीपात्रातून नावेने प्रवास करतात.गडचिरोली या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर सिरोंचा तालुका आहे. सदर तालुक्यात अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात विकास योजना पोहोचल्या नाहीत. परिणामी या भागातील कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला नाही. या भागातील बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने बरेचसे लोक आर्थिकदृष्ट्या ऐपत नसल्याच्या कारणावरून नदीपात्रातून नावेने धोकादायक प्रवास करीत असतात. प्रसंगी दुर्घटनाही होण्याची शक्यता असते.प्राणहिता नदीवरील पुलाच्या कामास गती देण्याची मागणीसोयीचा व सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्राणहिता नदीवर शासनाच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र आता पावसाळा असल्याने हे काम थंडबस्त्यात आहे. विद्यमान राज्य सरकारने पावसाळा संपल्यानंतर सदर कामाची गती वाढवावी, जेणेकरून उन्हाळ्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल. पूल पूर्ण झाल्यानंतर धोकादायक प्रवासही संपुष्ठात येणार आहे.

टॅग्स :riverनदी