शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

अरूंद पुलावर धोक्याची वाहतूक

By admin | Updated: August 14, 2016 01:30 IST

आघाडी सरकारच्या काळात वैरागड-मानापूर मार्गावरील डोंगरतमाशी घाटावर खोब्रागडी नदीपात्रात पुलाचे बांधकाम करण्यात आले.

संरक्षक कठड्यांचा अभाव : खोब्रागडी नदीच्या डोंगरतमाशी घाटावरील वास्तव वैरागड : आघाडी सरकारच्या काळात वैरागड-मानापूर मार्गावरील डोंगरतमाशी घाटावर खोब्रागडी नदीपात्रात पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या पुलाची रूंदी अत्यंत कमी आहे. सध्या पुलावर संरक्षक कठड्यांचा अभाव असल्याने वर्षभर विशेषत: पावसाळ्यात येथून होणारी वाहतूक धोक्याची ठरत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पुलावरून बैलजोडी नदीपात्रात पडून बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आरमोरी तालुक्यातील मानापूर-पिसेवडधा या गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम खोब्रागडी नदीपात्रात करण्यात आले. थोड्याच अंतरावर असताना नियमानुसार डोंगरतमाशी घाटावर नवा पूल बांधण्याची शक्यता कमी होती. परंतु माजी आ. आनंदराव गेडाम यांनी स्वगाव वडेगावला जोडणारा पूल बांधण्यासाठी आघाडी शासनाकडे पाठपुरावा करून पूल बांधकामाला मंजुरी मिळविली. त्यानंतर पुलाचे बांधकामही झाले. या पुलामुळे डोंगरतमाशी, वडेगाव, मेंढा, कुरंडी व परिसरातील गावातील प्रवाशांची सोय झाली. परंतु या पुलाची रूंदी कमी असल्याने त्यातच पुलावर संरक्षक कठडे नसल्याने पुलावरून प्रवास करणे अडचणीचे झाले आहे. नदी भरून वाहत असताना अनेकजण पूल ओलांडण्यास धजावत नाही. त्यामुळे पुलावरून थोडे पाणी असतानाही येथील वाहतूक ठप्प असते. (वार्ताहर) सोयीचा मात्र दुर्लक्षित पूल डोंगरतमाशी घाटावरील पूल परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा झाला असला तरी दुर्लक्षामुळे बांधकाम विभागाने पुलावर कठडे लावले नाही. उन्हाळ्यासह पावसाळ्यातही मोठा अपघात घडण्याची येथे शक्यता आहे. त्यामुळे येथील पुलावर संरक्षक कठडे लावावे, अशी मागणी डोंगरतमाशी व या परिसरातील नागरिकांनी साबांविकडे केली आहे.