शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

जळत्या झाडांमुळे वनव्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळून जाते. त्यानंतर वाळलेल्या झाडाला बुडातूनच आग लावली जाते. आगीमुळे झाडाचे खोड जळून झाड कोसळते. कोसळल्यानंतरही आग सुरूच राहते.

ठळक मुद्देदरवर्षी शेकडो झाडांची कत्तल । अतिक्रमण करण्यासाठी शेतकऱ्यांची शक्कल

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : शेताच्या बाजुला असलेल्या जंगल परिसरात अवैध अतिक्रमण करण्यासाठी उभ्या झाडांना आग लावण्याचे प्रकार एटापल्ली तालुक्यात वाढले आहेत. यामुळे दरवर्षी शेकडो झाडे जळत असून हळूहळू जंगल नष्ट होण्याचा धोका वाढत आहे.तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळून जाते. त्यानंतर वाळलेल्या झाडाला बुडातूनच आग लावली जाते. आगीमुळे झाडाचे खोड जळून झाड कोसळते. कोसळल्यानंतरही आग सुरूच राहते. काही दिवसानंतर या लाकडाची पूर्णपणे राख होते. या पध्दतीने दरवर्षी तीन ते चार झाडे नष्ट केली जातात. या पद्धतीने झालेली वृक्षतोड वन विभागाच्या लक्षात येत नाही. मात्र शेकडो शेतकरी असा प्रकार करीत असल्याने दरवर्षी हजारो झाडे नष्ट होत आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास जंगल नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही. वन विभागाने सर्वे करून ज्या शेतकºयाच्या शेताजवळ अशा प्रकारे झाडे जळत आहेत. अशा शेतकºयांवर कारवाई करावी, जेणेकरून असे प्रकार वाढीस लागणार नाही.जंगल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना लाकडांची कमतरता नाही. त्यामुळे झाड सुकल्यानंतर त्याला तोडून घरी नेले जात नाही. तर त्याला आग लावली जाते. सदर आग कित्येक दिवस सुरूच राहते. वादळ वाºयामुळे झाडाला लागलेली आग जंगलात पसरून त्याचे वनव्यात रूपांतर होण्याची शक्यता राहते.उन्हाळ्याच्या दिवसात आगी लागू नये म्हणून वन विभागाने स्वतंत्र गस्ती पथक तयार केले आहे. मात्र सदर पथक सुध्दा संबंधित शेतकºयांवर कोणतीही कारवाई करीत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :forestजंगलEnchroachmentअतिक्रमण