शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

जळत्या झाडांमुळे वनव्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळून जाते. त्यानंतर वाळलेल्या झाडाला बुडातूनच आग लावली जाते. आगीमुळे झाडाचे खोड जळून झाड कोसळते. कोसळल्यानंतरही आग सुरूच राहते.

ठळक मुद्देदरवर्षी शेकडो झाडांची कत्तल । अतिक्रमण करण्यासाठी शेतकऱ्यांची शक्कल

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : शेताच्या बाजुला असलेल्या जंगल परिसरात अवैध अतिक्रमण करण्यासाठी उभ्या झाडांना आग लावण्याचे प्रकार एटापल्ली तालुक्यात वाढले आहेत. यामुळे दरवर्षी शेकडो झाडे जळत असून हळूहळू जंगल नष्ट होण्याचा धोका वाढत आहे.तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळून जाते. त्यानंतर वाळलेल्या झाडाला बुडातूनच आग लावली जाते. आगीमुळे झाडाचे खोड जळून झाड कोसळते. कोसळल्यानंतरही आग सुरूच राहते. काही दिवसानंतर या लाकडाची पूर्णपणे राख होते. या पध्दतीने दरवर्षी तीन ते चार झाडे नष्ट केली जातात. या पद्धतीने झालेली वृक्षतोड वन विभागाच्या लक्षात येत नाही. मात्र शेकडो शेतकरी असा प्रकार करीत असल्याने दरवर्षी हजारो झाडे नष्ट होत आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास जंगल नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही. वन विभागाने सर्वे करून ज्या शेतकºयाच्या शेताजवळ अशा प्रकारे झाडे जळत आहेत. अशा शेतकºयांवर कारवाई करावी, जेणेकरून असे प्रकार वाढीस लागणार नाही.जंगल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना लाकडांची कमतरता नाही. त्यामुळे झाड सुकल्यानंतर त्याला तोडून घरी नेले जात नाही. तर त्याला आग लावली जाते. सदर आग कित्येक दिवस सुरूच राहते. वादळ वाºयामुळे झाडाला लागलेली आग जंगलात पसरून त्याचे वनव्यात रूपांतर होण्याची शक्यता राहते.उन्हाळ्याच्या दिवसात आगी लागू नये म्हणून वन विभागाने स्वतंत्र गस्ती पथक तयार केले आहे. मात्र सदर पथक सुध्दा संबंधित शेतकºयांवर कोणतीही कारवाई करीत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :forestजंगलEnchroachmentअतिक्रमण