शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

परप्रांतीय शेतकऱ्यांच्या अपडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:07 IST

तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यात भाड्याने घेतली आहे शेती तेलंगणातून ये-जा 

सुरेंद्र अलोणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. या शेतकऱ्यांवर प्रशासनाने प्रतिबंध घालावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी अहेरी परिसरातील शेतकऱ्यांची शेती भाड्याने घेतात. या शेतीमध्ये टरबूज, कापूस, मिरची आदी नगदी पिकांची लागवड करतात. या माध्यमातून ते एकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खत व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे अल्पावधीतच जमीन नापिक होते. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. जास्त पैसे मिळतात, या लालसेने आपली शेती परप्रांतीय शेतकऱ्यांना कसण्यासाठी देतात.पिकांची लागवड केल्यानंतर परप्रांतीय शेतकरी तेलंगणा ते अहेरी तालुक्यात सतत ये-जा करतात. कोरोनामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीही सदर शेतकरी तेलंगणा राज्यातून नदीमार्गे सातत्याने ये-जा करतात. विशेष म्हणजे, हे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी तेलंगणा राज्यातील शहरांमध्ये जाऊन येतात. त्यामुळे या शेतकऱ्यांसोबतच कोरोनाची साथ अहेरी परिसरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

प्रतिबंधीत कीटकनाशकांचा वापरपरप्रांतीय शेतकरी प्रामुख्याने कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या ग्लायसील चोरबिटी या कापसाच्या बियाण्यांची लागवड करतात. मोठ्या प्रमाणात तण नाशकाचा वापर केला जाते. शेतकºयांच्या जमिनी अल्पावधीतच नापीक बनत चालल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या ट्रॅक्टरचाही रोजगार हिरावल्या गेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस