शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धानाचे झाले तणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून पाऊस बेपत्ता : हजारो हेक्टरवरील धानपीक करपले; शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे.यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनचे रोवणीपर्यंतची कामे अगदी वेळेवर झाली. आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे हिरवेगार धानपीक डोलत होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने कायमची उसंत घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी तलाव, बोड्यांचे पाणी देत आहेत. त्यामुळे त्यांचे धानपीक चांगले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांचे धानपीक करपले आहे.धानामध्ये हलका, मध्यम व जास्त कालावधीचा धान लावला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी हलका व मध्यम कालावधीत निसवणारे धान लावतात. सदर धान लवकर निसवत असल्याने या धानाची रोवणी वेळेवर होणे आवश्यक आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पावसात सातत्य राहत नसल्याने धानाची रोवणी लांबत होती. याचा परिणाम हलक्या धानाच्या उत्पादनावर होत होता. त्याचबरोबर ऐन कापणीच्या कालावधीत पाऊस पडत असल्याने हलक्या धानाची नासाडी होत होती. मागील काही वर्षांचा हा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी काही शेतकऱ्यांनी जड धानाची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंदाज चुकला व याचा फटका यावर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील धानपीक करपायला लागले आहे.शेतकऱ्यांनी धानपिकाच्या लागवडीवर लाखो रूपयांचा खर्च केला. मात्र ऐन धान निसवण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी धान करपले आहे. जिल्हाभरात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही शासनाने मात्र गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीमधून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा सर्वे केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव वाढलामागीलवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमधील काही शेतांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विविध प्रकारचे महागडे कीटकनाशके फवारून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कित्येक एकरवरील धानपीक तुडतुडा रोगामुळे करपले होते. हीच स्थिती यावर्षीही राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कपाशी, सोयाबीनलाही फटकाकोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन व कापूस पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात दिवसेंदिवस कापूस पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागीलवर्षी कापसाचे पीक दमदार होते. यावर्षी मात्र पावसाअभावी कापूस पीकही करपायला लागले आहे. बोंड लागण्याच्या मार्गावर असतानाच कापसाची पिके पिवळी पडली आहेत. याचा मोठा फटका कापूस उत्पादकांनाही होणार आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत पडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी