शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पावसाअभावी धानाचे झाले तणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून पाऊस बेपत्ता : हजारो हेक्टरवरील धानपीक करपले; शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे.यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनचे रोवणीपर्यंतची कामे अगदी वेळेवर झाली. आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे हिरवेगार धानपीक डोलत होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने कायमची उसंत घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी तलाव, बोड्यांचे पाणी देत आहेत. त्यामुळे त्यांचे धानपीक चांगले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांचे धानपीक करपले आहे.धानामध्ये हलका, मध्यम व जास्त कालावधीचा धान लावला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी हलका व मध्यम कालावधीत निसवणारे धान लावतात. सदर धान लवकर निसवत असल्याने या धानाची रोवणी वेळेवर होणे आवश्यक आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पावसात सातत्य राहत नसल्याने धानाची रोवणी लांबत होती. याचा परिणाम हलक्या धानाच्या उत्पादनावर होत होता. त्याचबरोबर ऐन कापणीच्या कालावधीत पाऊस पडत असल्याने हलक्या धानाची नासाडी होत होती. मागील काही वर्षांचा हा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी काही शेतकऱ्यांनी जड धानाची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंदाज चुकला व याचा फटका यावर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील धानपीक करपायला लागले आहे.शेतकऱ्यांनी धानपिकाच्या लागवडीवर लाखो रूपयांचा खर्च केला. मात्र ऐन धान निसवण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी धान करपले आहे. जिल्हाभरात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही शासनाने मात्र गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीमधून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा सर्वे केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव वाढलामागीलवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमधील काही शेतांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विविध प्रकारचे महागडे कीटकनाशके फवारून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कित्येक एकरवरील धानपीक तुडतुडा रोगामुळे करपले होते. हीच स्थिती यावर्षीही राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कपाशी, सोयाबीनलाही फटकाकोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन व कापूस पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात दिवसेंदिवस कापूस पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागीलवर्षी कापसाचे पीक दमदार होते. यावर्षी मात्र पावसाअभावी कापूस पीकही करपायला लागले आहे. बोंड लागण्याच्या मार्गावर असतानाच कापसाची पिके पिवळी पडली आहेत. याचा मोठा फटका कापूस उत्पादकांनाही होणार आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत पडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी