शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
2
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
3
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
4
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
5
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
6
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
7
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
8
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
9
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
10
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
11
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
12
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
13
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
14
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
15
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
16
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
17
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
18
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
19
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
20
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धानाचे झाले तणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून पाऊस बेपत्ता : हजारो हेक्टरवरील धानपीक करपले; शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे.यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनचे रोवणीपर्यंतची कामे अगदी वेळेवर झाली. आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे हिरवेगार धानपीक डोलत होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने कायमची उसंत घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी तलाव, बोड्यांचे पाणी देत आहेत. त्यामुळे त्यांचे धानपीक चांगले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांचे धानपीक करपले आहे.धानामध्ये हलका, मध्यम व जास्त कालावधीचा धान लावला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी हलका व मध्यम कालावधीत निसवणारे धान लावतात. सदर धान लवकर निसवत असल्याने या धानाची रोवणी वेळेवर होणे आवश्यक आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पावसात सातत्य राहत नसल्याने धानाची रोवणी लांबत होती. याचा परिणाम हलक्या धानाच्या उत्पादनावर होत होता. त्याचबरोबर ऐन कापणीच्या कालावधीत पाऊस पडत असल्याने हलक्या धानाची नासाडी होत होती. मागील काही वर्षांचा हा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी काही शेतकऱ्यांनी जड धानाची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंदाज चुकला व याचा फटका यावर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील धानपीक करपायला लागले आहे.शेतकऱ्यांनी धानपिकाच्या लागवडीवर लाखो रूपयांचा खर्च केला. मात्र ऐन धान निसवण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी धान करपले आहे. जिल्हाभरात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही शासनाने मात्र गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीमधून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा सर्वे केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव वाढलामागीलवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमधील काही शेतांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विविध प्रकारचे महागडे कीटकनाशके फवारून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कित्येक एकरवरील धानपीक तुडतुडा रोगामुळे करपले होते. हीच स्थिती यावर्षीही राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कपाशी, सोयाबीनलाही फटकाकोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन व कापूस पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात दिवसेंदिवस कापूस पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागीलवर्षी कापसाचे पीक दमदार होते. यावर्षी मात्र पावसाअभावी कापूस पीकही करपायला लागले आहे. बोंड लागण्याच्या मार्गावर असतानाच कापसाची पिके पिवळी पडली आहेत. याचा मोठा फटका कापूस उत्पादकांनाही होणार आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत पडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी