शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: July 27, 2014 00:06 IST

वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा, गाढवी, खोब्रागडी या तीनही नद्यांमुळे पूर परिस्थिती बिकट झाली व नदीकाठावरील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्याचे

१३ गावांना फटका : आरमोरी तालुक्यातील अनेक शेत अद्यापही पाण्यातठाणेगाव : वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा, गाढवी, खोब्रागडी या तीनही नद्यांमुळे पूर परिस्थिती बिकट झाली व नदीकाठावरील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्यापही शेताच्या बांधीमध्ये पाणी जमा असल्याने धानपीक वाहून गेले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. देऊळगावजवळ वैनगंगा, गाढवी आणि खोब्रागडी या तीन नद्यांचा संगम आहे. तसेच वैनगंगा नदीला गोसेखुर्द, पुजारी टोला व संजय सरोवराचे पाणी सोडण्यात येत आहे. तसचे गाढवी नदीला इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आरमोरी तालुक्यातील आरमोरी, डोंगरगाव, ठाणेगाव, देऊळगाव, इंजेवारी, डोंगरसावंगी, चुरमुरा, किटाळी, शिवणी, वघाळा, वासाळा, रामाळा, कनेरी या गावातील शेतकऱ्यांची शेती पूराखाली आलेली आहे. दरवर्षीच नद्यांना धरणाचे पाणी सोडल्याने या भागातील शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसतो. दुबार पेरणीचे संकट कायम असताना धरणातून पाणी सोडल्याने मानवनिर्मित संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)