शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

नैसर्गिक आपत्तीने ४९ लाखांचे नुकसान

By admin | Updated: August 17, 2015 01:19 IST

एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे.

गडचिरोली : एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर २४५ पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला चार दिवस मुसळधार पाऊस पडला होता. त्या चार दिवसांच्या पावसामुळे जिल्हाभरातील नद्यांना पूर आला होता. त्या कालावधीत सर्वाधिक नुकसान भामरागड, एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे झाले होते. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतल्याने फारसे नुकसान झाले नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीमधील खडक अत्यंत दणकट आहे. त्यामुळे भूकंपासारख्या आजपर्यंत तरी घडल्या नाही. मात्र नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वाधिक नुकसान पावसामुळे होते. गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर अनेक नदी व नाले आहेत. या नदी नाल्यांवर अजूनही पूल बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडताना बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना पावसाळ्याच्या दिवसात घडतात. १ एप्रिल ते १० आॅगस्ट या कालावधीत पावसामुळे एकूण ४८ लाख ७४ हजार ३११ रूपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये घर पडणे, जनावरे वाहून जाणे आदींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित नागरिकांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी, असे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसान होताच तीन ते चार दिवसांच्या आतच तहसीलदारांच्या मार्फतीने आर्थिक मदत संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. आतापर्यंत ३२ लाख ७९ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अजूनही १५ लाखांची मदत देणे शिल्लक आहे. (नगर प्रतिनिधी)