शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीने ४९ लाखांचे नुकसान

By admin | Updated: August 17, 2015 01:19 IST

एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे.

गडचिरोली : एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर २४५ पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला चार दिवस मुसळधार पाऊस पडला होता. त्या चार दिवसांच्या पावसामुळे जिल्हाभरातील नद्यांना पूर आला होता. त्या कालावधीत सर्वाधिक नुकसान भामरागड, एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे झाले होते. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतल्याने फारसे नुकसान झाले नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीमधील खडक अत्यंत दणकट आहे. त्यामुळे भूकंपासारख्या आजपर्यंत तरी घडल्या नाही. मात्र नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वाधिक नुकसान पावसामुळे होते. गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर अनेक नदी व नाले आहेत. या नदी नाल्यांवर अजूनही पूल बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडताना बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना पावसाळ्याच्या दिवसात घडतात. १ एप्रिल ते १० आॅगस्ट या कालावधीत पावसामुळे एकूण ४८ लाख ७४ हजार ३११ रूपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये घर पडणे, जनावरे वाहून जाणे आदींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित नागरिकांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी, असे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसान होताच तीन ते चार दिवसांच्या आतच तहसीलदारांच्या मार्फतीने आर्थिक मदत संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. आतापर्यंत ३२ लाख ७९ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अजूनही १५ लाखांची मदत देणे शिल्लक आहे. (नगर प्रतिनिधी)