शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

पीक विमा शेतकऱ्यांसाठी लाभदायक

By admin | Updated: April 9, 2016 01:01 IST

ओला किंवा कोरड्या दुष्काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. कधी कधी उत्पादन खर्चही भरून निघत नाही.

खासदारांचे प्रतिपादन : पंतप्रधान पीक विमा योजना- शेतकरी मेळावागडचिरोली : ओला किंवा कोरड्या दुष्काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. कधी कधी उत्पादन खर्चही भरून निघत नाही. या संकटातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. सदर योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असल्याने या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने पंतप्रधान पीक विमा योजना- शेतकरी मेळाव्याचे आयोजन ७ एप्रिल रोजी करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप लांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माच्या उपसंचालक प्रीती हिरडकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक कांता मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान कृषी तंत्रज्ञान व बचतगट तसेच कृषी पत पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रदर्शन घडविण्यात आले. प्रदर्शनमध्ये कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, तालुका कृषी अधिकारी, विभागय कृषी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना पीक विम्याची माहिती देण्यात आली. पीक विमा योजनेशी संबंधित ध्वनी चित्रफित सर्व शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. कृषी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या विविध घडीपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्या दरम्यान राजेंद्र भरगड, दिलीप भरसाकडे, तोटावार, डॉ. प्रशांत बुरले, डॉ. विलास अतकरे यांनी मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)