शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही कोरोना सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST

सद्य:स्थितीत जिल्ह्यात २१६८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यातील गडचिरोली शहर आणि परिसरातील ८९६ रुग्ण असून, उर्वरित १२७२ रुग्ण जिल्ह्याच्या ...

सद्य:स्थितीत जिल्ह्यात २१६८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यातील गडचिरोली शहर आणि परिसरातील ८९६ रुग्ण असून, उर्वरित १२७२ रुग्ण जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांतील आहेत. म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे अनेक जण रुग्णालयात थांबण्याऐवजी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत; पण हे करताना आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याऐवजी बिनधास्तपणे बाहेर पडत आहेत. त्यातून कोरोना पसरत आहे.

गावांमध्ये नियंत्रण नाही

- गेल्या वर्षी गावात एखादा रुग्ण निघाला तरी त्याचे घर आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून तिकडे जाण्यास मनाई केली जात होती. आता तसे होत नसल्यामुळे कुठे कोण रुग्ण आहे हे कळतच नाही.

- स्वत:च्या घरी सर्व नियम पाळून राहण्याची हमी देणारे रुग्ण बाहेर पडतात. त्यांच्या संपर्कात आलेले लोकही मग पॉझिटिव्ह होऊन कोरोनाबाधितांची संख्या वाढवितात.

- आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहून सूचना करणे गरजेचे असते; पण त्यात सातत्य नसल्यामुळे रुग्ण अनियंत्रित होतात.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही

- एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याचा शोध घेणे गरजेचे असते. म्हणजे तो पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता का, हेसुद्धा कळू शकते.

- रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तो नजीकच्या काळात कोणाच्या संपर्कात आला होता याचा शोध घेतल्यास त्या रुग्णापासून कोणाला कोरोनाची बाधा झाली असू शकते हे शोधणे सोपे जाते.

- परंतु अशा पद्धतीने संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची टेस्ट करणे, विलगीकरणात ठेवणे याकडे ग्रामीण भागात फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कोरोना पसरत आहे.