शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

वृक्ष लागवडीला यावर्षी कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती.

ठळक मुद्देउद्दीष्ट घटले : निधीअभावी केवळ ६.८२ लाख वृक्षलागवडीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा फटका वृक्ष लागवड योजनेलाही बसला आहे. वृक्ष लागवडीसाठी गडचिरोली वनवृत्ताला निधी उपलब्ध करून न दिल्याने यावर्षी केवळ ७ लाख ४ हजार वृक्ष लागवड होणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी गडचिरोली वनवृत्तांतर्गत सुमारे ५८ लाख ३६ हजार वृक्ष लागवड केली होती.पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती. वन विभागालाच सर्वाधिक उद्दिष्ट दिले जात होते.मागील वर्षी वन विभागाने कृत्रिम वृक्ष लागवड योजनेंतर्गत २८ लाख ८८ हजार तर नैसर्गिक पुनरूत्पादनांतर्गत २९ लाख ४८ हजार असे एकूण ५८ लाख ३६६ हजार रोपांची लागवड केली होती. वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत वन विभागाला निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीच्या पावसाळ्यात १५ लाख ५८ हजार वृक्ष लागवड केली जाईल. त्यासाठी २३ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र शासनाने केवळ ३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एवढ्या निधीतून १५ लाख वृक्षांची लागवड करणे कठीण असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही कमी करून ते ७ लाख ४ हजारावर आणले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वृक्ष लागवड अत्यंत कमी होणार आहे.गडचिरोली, देसाईगंज, भामरागड विभागाला खोशासनाकडून वृक्ष लागवडीसाठी पुरेसा निधी प्राप्त झाला नसल्याने गडचिरोली, देसाईगंज आणि भामरागड वन विभागाला यावर्षी वृक्ष लागवडीतून खो देण्यात आला आहे. केवळ आलापल्ली व सिरोंचा वन विभागात वृक्ष लागवड होणार आहे. काळाच्या ओघात काही वृक्ष नष्ट होतात. त्यांच्या जागेवर नवीन वृक्षांची लागवड करावी लागते. याबाबत वन विभाग पुढील १० वर्षांचे नियोजन करते. त्याला कार्यआयोजन असे संबोधले जाते. केवळ यासाठीच शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. यातून ३०३.२५ हेक्टर क्षेत्रावर ६.८२ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. जिल्हा योजनेतून सिरोंचा वन विभागात २० हेक्टर क्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागcorona virusकोरोना वायरस बातम्या