शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

वृक्ष लागवडीला यावर्षी कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती.

ठळक मुद्देउद्दीष्ट घटले : निधीअभावी केवळ ६.८२ लाख वृक्षलागवडीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा फटका वृक्ष लागवड योजनेलाही बसला आहे. वृक्ष लागवडीसाठी गडचिरोली वनवृत्ताला निधी उपलब्ध करून न दिल्याने यावर्षी केवळ ७ लाख ४ हजार वृक्ष लागवड होणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी गडचिरोली वनवृत्तांतर्गत सुमारे ५८ लाख ३६ हजार वृक्ष लागवड केली होती.पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती. वन विभागालाच सर्वाधिक उद्दिष्ट दिले जात होते.मागील वर्षी वन विभागाने कृत्रिम वृक्ष लागवड योजनेंतर्गत २८ लाख ८८ हजार तर नैसर्गिक पुनरूत्पादनांतर्गत २९ लाख ४८ हजार असे एकूण ५८ लाख ३६६ हजार रोपांची लागवड केली होती. वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत वन विभागाला निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीच्या पावसाळ्यात १५ लाख ५८ हजार वृक्ष लागवड केली जाईल. त्यासाठी २३ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र शासनाने केवळ ३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एवढ्या निधीतून १५ लाख वृक्षांची लागवड करणे कठीण असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही कमी करून ते ७ लाख ४ हजारावर आणले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वृक्ष लागवड अत्यंत कमी होणार आहे.गडचिरोली, देसाईगंज, भामरागड विभागाला खोशासनाकडून वृक्ष लागवडीसाठी पुरेसा निधी प्राप्त झाला नसल्याने गडचिरोली, देसाईगंज आणि भामरागड वन विभागाला यावर्षी वृक्ष लागवडीतून खो देण्यात आला आहे. केवळ आलापल्ली व सिरोंचा वन विभागात वृक्ष लागवड होणार आहे. काळाच्या ओघात काही वृक्ष नष्ट होतात. त्यांच्या जागेवर नवीन वृक्षांची लागवड करावी लागते. याबाबत वन विभाग पुढील १० वर्षांचे नियोजन करते. त्याला कार्यआयोजन असे संबोधले जाते. केवळ यासाठीच शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. यातून ३०३.२५ हेक्टर क्षेत्रावर ६.८२ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. जिल्हा योजनेतून सिरोंचा वन विभागात २० हेक्टर क्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागcorona virusकोरोना वायरस बातम्या