शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीला यावर्षी कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती.

ठळक मुद्देउद्दीष्ट घटले : निधीअभावी केवळ ६.८२ लाख वृक्षलागवडीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा फटका वृक्ष लागवड योजनेलाही बसला आहे. वृक्ष लागवडीसाठी गडचिरोली वनवृत्ताला निधी उपलब्ध करून न दिल्याने यावर्षी केवळ ७ लाख ४ हजार वृक्ष लागवड होणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी गडचिरोली वनवृत्तांतर्गत सुमारे ५८ लाख ३६ हजार वृक्ष लागवड केली होती.पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती. वन विभागालाच सर्वाधिक उद्दिष्ट दिले जात होते.मागील वर्षी वन विभागाने कृत्रिम वृक्ष लागवड योजनेंतर्गत २८ लाख ८८ हजार तर नैसर्गिक पुनरूत्पादनांतर्गत २९ लाख ४८ हजार असे एकूण ५८ लाख ३६६ हजार रोपांची लागवड केली होती. वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत वन विभागाला निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीच्या पावसाळ्यात १५ लाख ५८ हजार वृक्ष लागवड केली जाईल. त्यासाठी २३ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र शासनाने केवळ ३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एवढ्या निधीतून १५ लाख वृक्षांची लागवड करणे कठीण असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही कमी करून ते ७ लाख ४ हजारावर आणले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वृक्ष लागवड अत्यंत कमी होणार आहे.गडचिरोली, देसाईगंज, भामरागड विभागाला खोशासनाकडून वृक्ष लागवडीसाठी पुरेसा निधी प्राप्त झाला नसल्याने गडचिरोली, देसाईगंज आणि भामरागड वन विभागाला यावर्षी वृक्ष लागवडीतून खो देण्यात आला आहे. केवळ आलापल्ली व सिरोंचा वन विभागात वृक्ष लागवड होणार आहे. काळाच्या ओघात काही वृक्ष नष्ट होतात. त्यांच्या जागेवर नवीन वृक्षांची लागवड करावी लागते. याबाबत वन विभाग पुढील १० वर्षांचे नियोजन करते. त्याला कार्यआयोजन असे संबोधले जाते. केवळ यासाठीच शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. यातून ३०३.२५ हेक्टर क्षेत्रावर ६.८२ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. जिल्हा योजनेतून सिरोंचा वन विभागात २० हेक्टर क्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागcorona virusकोरोना वायरस बातम्या