शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कोरोनामुळे माहेरची वाट झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST

चामोर्शी : कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हा बंदी आदी उपाय योजना सुरू केल्या असून, याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत ...

चामोर्शी : कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हा बंदी आदी उपाय योजना सुरू केल्या असून, याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. मात्र, नवविवाहित मुलींना आपल्या माहेर दुरावल्याची खंत मनात सारखी बोचत असल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊन कालावधीतही लग्न सोहळे पार पडत आहेत. एकदा लग्न लावून गेलेली मुलगी परतीला न येता सासरी रममाण होण्याची पाळी आली आहे. लग्न झाल्यावर मुली किमान दोन ते तीनवेळा माहेरी येत असतात. मात्र, जिल्हाबंदी असल्याने त्यांना येणे शक्य नाही. उन्हाळी सुट्टीत मुलांना शाळा नसते. अशा अवस्थेत चार दिवस माहेरी जाऊन तेथील वातावरणात रममाण होण्याची मनोमन इच्छा प्रत्येक विवाहित मुलींना असते. मात्र, कोरोनाने माहेरची वाट दूर गेली आहे. सध्या विवाहित मुली आपल्या माहेरातील आई, वडील व इतर मंडळींशी मोबाईलने आभासी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात कधी व्हिडिओ कॉल करून माहेरातील आठवणीला उजाळा देत आहेत. प्रत्येक विवाहित मुलीला आपल्या माहेरची आठवण येणे साहजिकच आहे. अशातच कोरोनामुळे माहेरातील पाहुणचारालासुद्धा मुकावे लागले आहे. लग्न सोहळ्यासाठी केवळ २५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. माहेरी होणाऱ्या आप्तस्वकियांच्या लग्न सोहळ्यातही उपस्थिती दर्शविणे कठीण झाले आहे. तसेच अंत्यविधीसाठीसुध्दा उपस्थितीची अट घालून दिली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी जाणे अवघड जात आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी संकटाने जीव कासावीस झाला आहे. नातेवाईकांच्या उन्हाळी भेटीवर विरजण पडले आहे. केव्हा लॉकडाऊन मोकळे होईल व कधी माहेरी जाईन, याची ओढ लागली आहे.