२३ मार्चला चामोर्शी पोलीस स्टेशन येथे येत्या काही दिवसांत येणारे होळी, धुलिवंदन, शिवाजी महाराज जयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती व हनुमान जयंती आदी उत्सव साजरा करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शांतता कमिटीची सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलत होते. या सभेला पोलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, जिल्हा विकास संशोधन व संस्थेचे तालुकाध्यक्ष पी. जे. सातार, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आशिष पिपरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमित यासलवार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद खोबे, डॉ. तामदेव दुधबळे, जयराम चलाख, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, बबन वडेट्टीवार, चंद्रकांत बुरांडे आदी उपस्थित होते. या सभेत होळी, धुलिवंदन, शिवाजी जयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी येणारे उत्सव कोराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कशा पद्धतीने साजरे करावयाचे याबाबत उपस्थित सदस्यांनी मत व्यक्त केले. त्यानुसार येणारे सर्व उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर धुलिवंदनाच्या दिवशी कोणतेही घटना घडू नये, यासाठी मार्कडा नदीघाटावर बंदोबस्त ठेवण्याबाबत व चामोर्शी शहरातील पोलीस गस्त ठेवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST