शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

झाडावरच दाणापाण्याची केली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:19 IST

उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.

ठळक मुद्देपक्ष्यांचा किलबिलाट वाढला : अहेरी-महागाव मार्गावर ५० झाडांना बांधले मातीचे शेकडो पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या नेतृत्वात ही समिती अहेरी जिल्हा निर्मितीसाठी मागील सात वर्षांपासून सातत्याने संघर्ष करीत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यातही ही संस्था पुढाकार घेत असल्याने अहेरी विभागात या समितीची विशेष ओळख आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. जंगल तसेच शेतशिवारातील नदी, नाले, तलाव निर्जल झाले आहेत. उष्णतेचा पारा ४४ अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याची पूर्वीपेक्षा अधिक गरज असताना जलसाठे आटले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना गावाकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय शिल्लक राहला नाही. जंगलात एखादा पाणवटा असल्यास त्या ठिकाणी पशुपक्षी गोळा होत असल्याने शिकारी टपूनच राहतात. अशा परिस्थितीत पक्ष्यांच्या चारा व पाण्याची सोय झाडावरच होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या मार्गदर्शनात अहेरी-महागाव मार्गावरील झाडांवर पाणी व चाºयासाठी पात्र बांधले आहेत.एक किमी अंतरावरील पक्ष्यांसाठी सोयअहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या पुढाकारातून अहेरी-महागाव मार्गावरील जवळपास ५० वृक्षांना मातीचे पात्र बांधण्यात आले आहे. प्रत्येक वृक्षाला जवळपास पाच ते सहा पात्र बांधले आहेत. काही पात्रांमध्ये पाणी तर काही पात्रांमध्ये चारा टाकला जातो. महागाव मार्गावर पहाटेच्या सुमारास फिरायला जाणारे नागरिकही पात्रांमध्ये पाणी व चारा टाकत आहेत. त्यामुळे पक्षी बचाव ही चळवळ निर्माण होण्यास मदत झाली आहे. झाडावरच पाणी व चाºयाची सोय होत असल्याने झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. इतरही सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.