शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नळ योजना नियमित सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:37 IST

गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आवाहन : गडचिरोलीतील आठ सरपंचांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे. आज नागपूर विभागात १११ ग्रामपंचायतीअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा ई-शुभारंभ केलेला आहे. आता ग्रामपंचायतींनी पाणी पट्टीकर वसुल करून नळ योजना नियमित सुरू ठेवाव्या, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या ई- भूमिपूजनाचा कार्यक्रम नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच स्वच्छता विभागाचे सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधत असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, कार्यकारी अभियंता घोडमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, उपविभागीय अधिकारी कटरे, वरिष्ठ भुवैज्ञानिक पुराम, शाखा अभियंता संजय खोकले, भुजंगराव पदा, माटे उपस्थित होते.पुढे बोलताना ना. फडणवीस म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आलेली योजना म्हणजे नळ पाणी पुरवठा योजना मोठया प्रमाणात राबवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याकरिता ८८ कोटी रुपये खर्चाला मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. तसेच ग्रामपंचायतीनी ही योजना नियमित सुरु राहण्यासाठी पाणी पट्टीकर वसुलीसाठी प्रयत्नरत असावे. यावर्षी आपण ३३ कोटी वृक्ष लागवड करुन एक मोठी हरीत क्रांती करीत आहोत यामध्ये सर्व ग्रामपंचायतीनी, सर्व कार्यालयांनी, नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या स्मार्ट ग्रामपंचायत सोबतच हरीत ग्रामपंचायत करावी, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा ई- भूमिपूजन करुन शुभारंभ केला. यामध्ये अहेरी तालुक्यातील महागांव बु. आरमोरी मधील वडधा, चामोर्शी मधील कुनघाडा व कळमगांव एकोडी, धानोरा तालुक्यातील मिचगांव व साखेरा, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली आणि सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवीपेठा या गावांचा समावेश आहे. या आठ योजनांसाठी ५ कोटी ८९ लक्ष ८७ हजार रूपये खर्च होणार आहेत. यावेळी ८ ग्रा.पं.चे सरपंच हजर होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीsarpanchसरपंच