शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

नळ योजना नियमित सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:37 IST

गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आवाहन : गडचिरोलीतील आठ सरपंचांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे. आज नागपूर विभागात १११ ग्रामपंचायतीअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा ई-शुभारंभ केलेला आहे. आता ग्रामपंचायतींनी पाणी पट्टीकर वसुल करून नळ योजना नियमित सुरू ठेवाव्या, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या ई- भूमिपूजनाचा कार्यक्रम नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच स्वच्छता विभागाचे सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधत असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, कार्यकारी अभियंता घोडमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, उपविभागीय अधिकारी कटरे, वरिष्ठ भुवैज्ञानिक पुराम, शाखा अभियंता संजय खोकले, भुजंगराव पदा, माटे उपस्थित होते.पुढे बोलताना ना. फडणवीस म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आलेली योजना म्हणजे नळ पाणी पुरवठा योजना मोठया प्रमाणात राबवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याकरिता ८८ कोटी रुपये खर्चाला मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. तसेच ग्रामपंचायतीनी ही योजना नियमित सुरु राहण्यासाठी पाणी पट्टीकर वसुलीसाठी प्रयत्नरत असावे. यावर्षी आपण ३३ कोटी वृक्ष लागवड करुन एक मोठी हरीत क्रांती करीत आहोत यामध्ये सर्व ग्रामपंचायतीनी, सर्व कार्यालयांनी, नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या स्मार्ट ग्रामपंचायत सोबतच हरीत ग्रामपंचायत करावी, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा ई- भूमिपूजन करुन शुभारंभ केला. यामध्ये अहेरी तालुक्यातील महागांव बु. आरमोरी मधील वडधा, चामोर्शी मधील कुनघाडा व कळमगांव एकोडी, धानोरा तालुक्यातील मिचगांव व साखेरा, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली आणि सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवीपेठा या गावांचा समावेश आहे. या आठ योजनांसाठी ५ कोटी ८९ लक्ष ८७ हजार रूपये खर्च होणार आहेत. यावेळी ८ ग्रा.पं.चे सरपंच हजर होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीsarpanchसरपंच