शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोटापल्लीत ३ वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा; पाण्यात आढळून येतात जंतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:42 IST

आरोग्याची समस्या : नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये गत तीन वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, येथील नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. अशाही स्थितीत उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पाण्यात जंतूही आढळून आले होते. 

कोटापल्ली येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. वॉर्डातील बऱ्याच जणांना उलटी, जुलाब, यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. 

याशिवाय गावातील रस्ते खूपच खराब आहेत. सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते तसेच दुतर्फा पक्क्या नाल्या नाहीत. नालीमध्ये पाणी साचून राहत असल्याने येथे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये असलेला हातपंप खालून खचलेला असून बोअरवेल खराब झालेले आहे. उन्हाळ्यात तर या हातपंपामध्ये पाणी राहत नाही. कधी कधी दुसऱ्या गावाला जाऊन बैलगाडीने पाणी आणावे लागते. सध्या निर्माण झालेली समस्या लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यासंदर्भात जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यापुढेही नागरिकांनी समस्या मांडली. 

ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्षकोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, तसेच येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामसेवक, आणि सरपंच यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप गावातील नागरिकांचा आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणGadchiroliगडचिरोली