शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोटापल्लीत ३ वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा; पाण्यात आढळून येतात जंतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:42 IST

आरोग्याची समस्या : नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये गत तीन वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, येथील नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. अशाही स्थितीत उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पाण्यात जंतूही आढळून आले होते. 

कोटापल्ली येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. वॉर्डातील बऱ्याच जणांना उलटी, जुलाब, यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. 

याशिवाय गावातील रस्ते खूपच खराब आहेत. सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते तसेच दुतर्फा पक्क्या नाल्या नाहीत. नालीमध्ये पाणी साचून राहत असल्याने येथे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये असलेला हातपंप खालून खचलेला असून बोअरवेल खराब झालेले आहे. उन्हाळ्यात तर या हातपंपामध्ये पाणी राहत नाही. कधी कधी दुसऱ्या गावाला जाऊन बैलगाडीने पाणी आणावे लागते. सध्या निर्माण झालेली समस्या लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यासंदर्भात जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यापुढेही नागरिकांनी समस्या मांडली. 

ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्षकोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, तसेच येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामसेवक, आणि सरपंच यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप गावातील नागरिकांचा आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणGadchiroliगडचिरोली