शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

४०० हेक्टरवर धान बांध्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:57 IST

रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्देरोहयो अंतर्गत काम : पडिक जमीन झाली सुपीक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे.धान पीक हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या जवळपास ८० टक्के भागावर धान पिकाची खरिपात लागवड केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासाठी अनुकूल असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, येथील धानाची क्वॉलिटी अतिशय चांगली असल्याने धानापासून निर्माण झालेला तांदूळ विदेशात निर्यात केला जातो.धान पिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. पाणी जमिनीत टिकून राहावे यासाठी बांध्यांची निर्मिती करावी लागते. बांधी निर्मिती करण्यासाठी चारही बाजूने उंच माती टाकून पारे तयार करावे लागतात. याला बांध्या असे संबोधले जाते. बांध्यांची निर्मिती करण्यासाठी एका एकरामागे लाखो रूपयांचा खर्च येत असल्याने शेतकरी त्या तयार करू शकत नाही. परिणामी शेतीत धानाचे उत्पादन घेण्याची इच्छा असूनही शेती पडिक ठेवावी लागते. मागील काही वर्षांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बांध्या तयार करून दिल्या जात आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच शेतकºयांना धानाचे पीक घेण्यास सोयीचे होत आहे.२०१७-१८ या वर्षात २३५ कामे सूरू करण्यात आली. ३१ मार्चअखेर १३८ कामे पूर्ण झाली आहेत. यातून ३५४ हेक्टरवर बांध्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ९७ कामे प्रगतीपथावर होती. मे अखेर जवळपास १७ कामे पूर्ण झाली असून एकूण ४०० हेक्टरवर बांध्यांच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. अजुनही रोजगार हमी योजनेची कामे सुरूच असून ज्या कामांना सुरूवात झाली आहे, अशी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सर्वच कामे पूर्ण झाल्यास जवळपास ७०० हेक्टर जमिनीवर बांध्यांची निर्मिती होणार आहे. यामुळे पडिक शेती पिकाखाली येणार आहे.जिल्हाभरातील २०४ बोड्यांची दुरूस्तीसिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात मामा तलाव व बोड्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावितात. मात्र काळाच्या ओघात बोड्यांमध्ये गाळ साचला. त्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली. तर काही बोड्यांच्या पारी फुटल्या असल्याने बोडीमध्ये पाणी साचून राहत नाही. प्रशासनाने बोड्यांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. २०१७-१८ या वर्षात २०४ बोड्यांच्या दुरूस्तीची काम हाती घेतले होते. त्यातील मार्चअखेर १२८ बोड्या दुरूस्त झाल्या आहेत. ७६ कामे प्रगतीपथावर होती. यावर ६३ लाख ४६ हजार रूपये खर्च झाले आहेत.शेतकºयांच्या मागणीनुसार ३९ नवीन बोड्यांची निर्मिती केली जात आहे. त्यातील १७ बोड्या निर्मितीचे काम पूर्ण झाले. तर २२ कामे प्रगतीपथावर होती. सुमारे १० लाख ५० हजार रूपयांचा खर्च झाला आहे.२१ मामा तलावांचे नुतनीकरणगावात मामा तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका मामा तलावाच्या माध्यमातून जवळपास १०० ते ५०० हेक्टर क्षेत्रातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्याने मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा उपक्रमही शासनाने सुरू केला आहे. २०१७-१८ या वर्षात २१ मामा तलावांच्या दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आले होते. त्यातील मार्चअखेर ११ कामे पूर्ण झाली. तर १० कामे प्रगतीपथावर होती. यावर सुमारे ५२ लाख ५७ हजार रूपये खर्च झाला आहे.