शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

४०० हेक्टरवर धान बांध्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:57 IST

रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्देरोहयो अंतर्गत काम : पडिक जमीन झाली सुपीक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे.धान पीक हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या जवळपास ८० टक्के भागावर धान पिकाची खरिपात लागवड केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासाठी अनुकूल असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, येथील धानाची क्वॉलिटी अतिशय चांगली असल्याने धानापासून निर्माण झालेला तांदूळ विदेशात निर्यात केला जातो.धान पिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. पाणी जमिनीत टिकून राहावे यासाठी बांध्यांची निर्मिती करावी लागते. बांधी निर्मिती करण्यासाठी चारही बाजूने उंच माती टाकून पारे तयार करावे लागतात. याला बांध्या असे संबोधले जाते. बांध्यांची निर्मिती करण्यासाठी एका एकरामागे लाखो रूपयांचा खर्च येत असल्याने शेतकरी त्या तयार करू शकत नाही. परिणामी शेतीत धानाचे उत्पादन घेण्याची इच्छा असूनही शेती पडिक ठेवावी लागते. मागील काही वर्षांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बांध्या तयार करून दिल्या जात आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच शेतकºयांना धानाचे पीक घेण्यास सोयीचे होत आहे.२०१७-१८ या वर्षात २३५ कामे सूरू करण्यात आली. ३१ मार्चअखेर १३८ कामे पूर्ण झाली आहेत. यातून ३५४ हेक्टरवर बांध्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ९७ कामे प्रगतीपथावर होती. मे अखेर जवळपास १७ कामे पूर्ण झाली असून एकूण ४०० हेक्टरवर बांध्यांच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. अजुनही रोजगार हमी योजनेची कामे सुरूच असून ज्या कामांना सुरूवात झाली आहे, अशी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सर्वच कामे पूर्ण झाल्यास जवळपास ७०० हेक्टर जमिनीवर बांध्यांची निर्मिती होणार आहे. यामुळे पडिक शेती पिकाखाली येणार आहे.जिल्हाभरातील २०४ बोड्यांची दुरूस्तीसिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात मामा तलाव व बोड्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावितात. मात्र काळाच्या ओघात बोड्यांमध्ये गाळ साचला. त्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली. तर काही बोड्यांच्या पारी फुटल्या असल्याने बोडीमध्ये पाणी साचून राहत नाही. प्रशासनाने बोड्यांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. २०१७-१८ या वर्षात २०४ बोड्यांच्या दुरूस्तीची काम हाती घेतले होते. त्यातील मार्चअखेर १२८ बोड्या दुरूस्त झाल्या आहेत. ७६ कामे प्रगतीपथावर होती. यावर ६३ लाख ४६ हजार रूपये खर्च झाले आहेत.शेतकºयांच्या मागणीनुसार ३९ नवीन बोड्यांची निर्मिती केली जात आहे. त्यातील १७ बोड्या निर्मितीचे काम पूर्ण झाले. तर २२ कामे प्रगतीपथावर होती. सुमारे १० लाख ५० हजार रूपयांचा खर्च झाला आहे.२१ मामा तलावांचे नुतनीकरणगावात मामा तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका मामा तलावाच्या माध्यमातून जवळपास १०० ते ५०० हेक्टर क्षेत्रातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्याने मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा उपक्रमही शासनाने सुरू केला आहे. २०१७-१८ या वर्षात २१ मामा तलावांच्या दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आले होते. त्यातील मार्चअखेर ११ कामे पूर्ण झाली. तर १० कामे प्रगतीपथावर होती. यावर सुमारे ५२ लाख ५७ हजार रूपये खर्च झाला आहे.