शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

शहरात बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर, कारवाईची जबाबदारी उचलणार कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:37 IST

वाहनचालकांसाठी धोकादायक : थेट रस्त्यापर्यंत केले जाते बांधकाम, पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रस्त्यावर बांधकाम किंवा इतर साहित्य ठेवल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अपघात होऊन जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. रस्त्यावर साहित्य ठेवणाऱ्यांवर दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र, स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे वास्तव जिल्ह्यात बघायला मिळते.

शहरातील जुन्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे जागा खरेदीकरून घर बांधणे शक्य होत नाही. परिणामी भावाभावांचे हिस्से झाले, तरी त्याच घरात राहावे लागते. काही नागरिक नालीपर्यंत घराचे बांधकाम करतात. अंगणच नसल्याने रेती, लोखंड, गिट्टी आदी बांधकाम साहित्य रस्त्यावरच ठेवले जाते. आधीच रस्ता अरुंद त्यात त्याच रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होते. वेळप्रसंगी वाहन घसरून अपघात झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. ही स्थिती केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही आहे. गावातही नागरिक थेट रस्त्यावरच बांधकामाचे साहित्य ठेवत असल्याचे दिसून येते. 

गावांत रस्त्यावरील जनावरांमुळे वाहतुकीस अडथळाग्रामीण भागातील रस्ते आता सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. त्यामुळे काही पशुपालक थेट रस्त्यावर जनावरे बांधतात. जनावरांचे मलमूत्र त्याच ठिकाणी असते. याचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर जनावरे बांधण्याची समस्या अतिशय गंभीर होत चालली आहे. पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत ही जनावरे थेट रस्त्यावर बांधली राहतात.

तक्रारच नाही, तर कारवाई कशी होणार?एखादा व्यक्ती रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवत असेल, तर त्याबाबत संबंधित व्यक्तीने तक्रार करायला पाहिजे. मात्र, तक्रार केली जात नाही. परिणामी कारवाई करताना नगर परिषद व ग्रामपंचायतीलाही मर्यादा पडतात.

अतिक्रमणाने शहरातील रस्ते झाले अरुंदथेट रस्त्यापर्यंत घराचे बांधकाम केले जाते. परिणामी रस्ते अरुंद झाले आहेत. नाली बांधण्यासाठीसुद्धा जागा शिल्लक राहत नाही. एक चारचाकी वाहन रस्त्यावर असेल तर दुसरे वाहन जायला जागा राहत नाही, अशी स्थिती अनेक वॉर्डाची आहे. त्यामुळे वॉर्डात भांडण, तंटे निर्माण होतात.

चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्क

  • कार ही आता शहरातील नागरिकांची गरज बनत चालली आहे. बहुतांश कर्मचारी, व्यावसायिक लाखो रुपयांची कार खरेदी करतात. मात्र त्यांच्याकडे घरी कार ठेवण्यासाठी जागा नसते. परिणामी ते रस्त्यावरच कार पार्क करतात.
  • रस्ता अगोदरच अरुंद त्यात २ रस्त्यावर कार राहत असल्याने दुसरी कार पुढे जात नाही. त्यातून भांडणे होतात. दिवसेंदिवस शहरातील नागरिकांकडे वाहनांची संख्या वाढत चालली आहे.

"रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणे चुकीचे आहे. रात्रीच्या सुमारास अपघात घडतात. रेतीवरून वाहन घसरल्याने जीव जाऊ शकतो. नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. विशेषकरून रहदारी जास्त असलेल्या रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेऊ देऊ नये."- नीलेश भुरसे, नागरिक, गडचिरोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली