शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर, कारवाईची जबाबदारी उचलणार कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:37 IST

वाहनचालकांसाठी धोकादायक : थेट रस्त्यापर्यंत केले जाते बांधकाम, पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रस्त्यावर बांधकाम किंवा इतर साहित्य ठेवल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अपघात होऊन जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. रस्त्यावर साहित्य ठेवणाऱ्यांवर दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र, स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे वास्तव जिल्ह्यात बघायला मिळते.

शहरातील जुन्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे जागा खरेदीकरून घर बांधणे शक्य होत नाही. परिणामी भावाभावांचे हिस्से झाले, तरी त्याच घरात राहावे लागते. काही नागरिक नालीपर्यंत घराचे बांधकाम करतात. अंगणच नसल्याने रेती, लोखंड, गिट्टी आदी बांधकाम साहित्य रस्त्यावरच ठेवले जाते. आधीच रस्ता अरुंद त्यात त्याच रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होते. वेळप्रसंगी वाहन घसरून अपघात झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. ही स्थिती केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही आहे. गावातही नागरिक थेट रस्त्यावरच बांधकामाचे साहित्य ठेवत असल्याचे दिसून येते. 

गावांत रस्त्यावरील जनावरांमुळे वाहतुकीस अडथळाग्रामीण भागातील रस्ते आता सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. त्यामुळे काही पशुपालक थेट रस्त्यावर जनावरे बांधतात. जनावरांचे मलमूत्र त्याच ठिकाणी असते. याचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर जनावरे बांधण्याची समस्या अतिशय गंभीर होत चालली आहे. पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत ही जनावरे थेट रस्त्यावर बांधली राहतात.

तक्रारच नाही, तर कारवाई कशी होणार?एखादा व्यक्ती रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवत असेल, तर त्याबाबत संबंधित व्यक्तीने तक्रार करायला पाहिजे. मात्र, तक्रार केली जात नाही. परिणामी कारवाई करताना नगर परिषद व ग्रामपंचायतीलाही मर्यादा पडतात.

अतिक्रमणाने शहरातील रस्ते झाले अरुंदथेट रस्त्यापर्यंत घराचे बांधकाम केले जाते. परिणामी रस्ते अरुंद झाले आहेत. नाली बांधण्यासाठीसुद्धा जागा शिल्लक राहत नाही. एक चारचाकी वाहन रस्त्यावर असेल तर दुसरे वाहन जायला जागा राहत नाही, अशी स्थिती अनेक वॉर्डाची आहे. त्यामुळे वॉर्डात भांडण, तंटे निर्माण होतात.

चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्क

  • कार ही आता शहरातील नागरिकांची गरज बनत चालली आहे. बहुतांश कर्मचारी, व्यावसायिक लाखो रुपयांची कार खरेदी करतात. मात्र त्यांच्याकडे घरी कार ठेवण्यासाठी जागा नसते. परिणामी ते रस्त्यावरच कार पार्क करतात.
  • रस्ता अगोदरच अरुंद त्यात २ रस्त्यावर कार राहत असल्याने दुसरी कार पुढे जात नाही. त्यातून भांडणे होतात. दिवसेंदिवस शहरातील नागरिकांकडे वाहनांची संख्या वाढत चालली आहे.

"रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणे चुकीचे आहे. रात्रीच्या सुमारास अपघात घडतात. रेतीवरून वाहन घसरल्याने जीव जाऊ शकतो. नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. विशेषकरून रहदारी जास्त असलेल्या रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेऊ देऊ नये."- नीलेश भुरसे, नागरिक, गडचिरोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली