शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

संमती 12 हजार पालकांची विद्यार्थी हजर 10 हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 05:00 IST

काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देदरदिवशी वाढताहे पटसंख्या, सकारात्मक भूमिका

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २३ नाेव्हेंबपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. गुरूवारपर्यंत ११ हजार ५४५ पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहेत. त्यापैकी जवळपास ९ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दरदिवशी वर्गातील पटसंख्या वाढत चालली आहे.काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे. तसेच शाळेतील उपस्थिती सुध्दा वाढत चालली आहे. शिक्षण विभागामार्फत शाळांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. काेराेनाची साथ पसरू नये, यासाठी शाळेत काेणत्या उपाययाेजना केल्या जाव्यात याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले जात आहे. शिक्षकही पालकांच्या घरी जाऊन शाळेत काेणत्या सुविधा आहेत, हे सांगून पालकांचे मन वळवित आहेत. 

ग्रामीण भागातील शाळांना चांगला प्रतिसादशहर व तालुकास्तरावरील शाळांच्या तुलनेत ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये तर जवळपास ५० टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत. दरदिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत चालली आहे.  अध्यापनाचे कामही सुरू झाले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार शाळांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत की नाही. तसेच नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी शिक्षण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन करीत आहेत. ग्रामीण भागात चांगली उपस्थिती दिसून येत आहे. पालक सुध्दा  विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याविषयी सकारात्मक असल्याचे दिसत आहे. - राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी माध्यमिक

शहरात व तालुक्यात काेराेना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळेत पाठविणे धाेकादायक वाटत असले तरी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी पाल्याला शाळेत पाठविले जात आहे. काेराेनाचा संसर्ग हाेणार नाही, यासाठी शाळेने सुध्दा याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज  निर्माण झाली आहे.- दिनेश भांडेकर, पालक

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या