शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीविरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी संपूर्ण देशात नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार १०० व ५०० च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या.

ठळक मुद्देकाळा दिवस पाळला : निदर्शने व धरणे, सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी संपूर्ण देशात नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार १०० व ५०० च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. परिणामी सर्वसामान्यांना नोटबंदीचा त्रास झाला. ही नोटबंदी अयशस्वी झाल्याचे सांगत नोटबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी इंदिरा गांधी चौक परिसरात धरणे आंदोलन केले. तर युवक काँग्रेसच्या वतीने चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या विरोधात निदर्शने करण्यात आल्ी. तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिवसभर धरणे दिले. याप्रसंगी जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, जि.प. सदस्य किरण ताटपल्लीवार, जगदिश बद्रे, डी. डी. सोनटक्के, जगदिश पडीयार, लखन पडीयार, नंदू वाईलकर, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, सी. बी. आवळे, एजाज शेख, गौरव आलाम, उमेश कुळमेथे, हेमंत भांडेकर, राकेश रत्नावार, श्याम धाईत, मनोहर पोरेटी, निलिमा राऊत, रोहिणी मसराम, कुणाल पेंदोरकर, योगेश नैताम, राजू गारोदे, रामचंद्र गोटा, बाळू मडावी, कमलेश खोब्रागडे, वसंता राऊत, जंबेवार, मिलिंद खोब्रागडे आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात अनेक मुद्दे मांडले. यावेळी जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे, पांडुरंग घोटेकर यांनी सरकारच्या धोरणाचा भाषणातून निषेध केला.याशिवाय आरमोरी, चामोर्शी, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा आदी ठिकाणीही काँग्रेस पदाधिकाºयांनी सरकारचा निषेध केला.नोटबंदीवर काँग्रेसचा सरकारला सवालनोटबंदीने देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे केंद्र सरकारच्या वतीने नोटबंदीच्या निर्णयादरम्यान सांगण्यात आले होते. मात्र काळे धन बाहेर आले का? असा सवाल काँग्रेस पदाधिकाºयांनी सरकारला केला आहे. आतंकवाद थांबला का?, बोगस नोटा बंद झाल्या का? महागाई कमी झाली का? प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा झाले का? बेरोजगारी दूर झाली का? ९.२ वर असणारा देशाचा विकास दर ५.७ टक्क्यावर घसरला. नोटबंदीने तीन लाख कोटीचे नुकसान झाले? याला जबाबदार कोण? असे सवाल काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी आंदोलनातून उपस्थित केले आहेत.महिला काँग्रेसनेही केला निषेधमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी व जिल्हा महिला काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांच्या निर्देशानुसार, केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी काळा दिवस पाळला. महिला कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. यावेळी तालुका अध्यक्ष ज्योतीताई गव्हाने, उपाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, सपना गलगट, आरती कंगाले, पुष्पा चुधरी, शकुंतला हजारे, गीता बोरकर, दीक्षा वासनिक, हुंडा, फरीदा सयद, अर्चना नागापुरे, निर्मला गुरूनुले, चूडादेवी बर्सगदे, आशा मंगर, रेणुका गुहे आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.केंद्र सरकारची नोटबंदी फसली- उसेंडीकाळा पैसा बाहेर काढण्यासोबतच विविध समस्या मार्गी लागणार असल्याचे कारण पुढे करीत भाजप प्रणित केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला. मात्र केंद्र सरकारकडे पुरेशी यंत्रणा व कुठलेही नियोजन तसेच व्यवस्था नसल्यामुळे नोटबंदी नंतरच्या काळात देशभरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागली. बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहावे लागले. दरम्यान रांगेत चेंगराचेंगरी होऊन १०० वर नागरिकांचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला.नोटबंदीमुळे ज्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार होत्या. तसे काहीही झाले नाही. उलट बेरोजगारी, दहशतवाद व महागाई प्रचंड वाढली. त्यामुळे केंद्र सरकारची ही नोटबंदी पूर्णत: फसली आहे, असेही डॉ. उसेंडी यावेळी म्हणाले.विद्यमान सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवली आहे. तर यापुढे शिष्यवृत्ती न देण्याचा घाट रचला जात आहे. हे सरकार उद्योगपतींच्या हिताचे आहे, अशी टीका डॉ. उसेंडी यांनी यावेळी केली.