शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

उकाड्यामुळे क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यापासून प्रशासन सावध झाले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाला १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रशासनाने वसतिगृह, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. प्रशासनामार्फत या नागरिकांना जेवनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देकुलर लावण्याची परवानगी द्यावी । शारीरिक व मानसिक आजार होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. विलगीकरण कक्षात कुलरची सोय नाही. त्यामुळे गर्मीमुळे नागरिक हैराण आहेत. उकाड्यामुळे कोरोनाशिवाय इतर आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यापासून प्रशासन सावध झाले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाला १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रशासनाने वसतिगृह, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. प्रशासनामार्फत या नागरिकांना जेवनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.विलगीकरण कक्षाच्या सर्वच इमारती स्लॅबच्या आहेत. तापमानाचा पारा जवळपास ४५ अंशावर पोहोचला असल्याने स्लॅबच्या खोलीत झोपणे कठीण झाले आहे. काही खोल्यांमध्ये पंख्याची व्यवस्था आहे. तर काही ठिकाणचे पंखे बिघडले आहेत. तापमानामुळे स्लॅब गरम होऊन खोलीमध्ये थांबणे कठीण होत आहे. उकाड्यामुळे रात्री उशीरापर्यंत झोप येत नाही. दिवसा तर आग अंगावर यावी, अशी गरमी होत आहे. रात्री झोप होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांना अशक्त वाटणे, डोक दुखणे, अंगावर घामोळ्या तयार होणे, आदी आजार होत आहेत.विलगीकरण इमारतीच्या एका कक्षात चार ते पाच नागरिकांना एकत्र ठेवले जाते. त्यातील काही नागरिकांचे कुटुंब विलगीकरण कक्षात कुलर लावण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना कुलर लावू देण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. मात्र अशी परवानगी दिली जात नसल्याने उकाडा सहन करावा लागत आहे. ज्या गादीवर झोपतात, ती गादीही गरम होत असल्याने झोप येत नाही असे काही लोकांनी सांगितले. त्यामुळे शारीरिक आजारांबरोबरच मानसिक आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या