शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विजेसंबंधीची तक्रार करा आता मुंबईत

By admin | Updated: June 13, 2014 00:06 IST

महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून

गडचिरोली : महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून हे केंद्र बंद करण्यात आले आहे. आता वीजेसंबधीची तक्रार मुंबई भांडूप येथील केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण केंद्रातच स्विकारली जाणार आहे. गेल्या पाच महिन्यापासून महावितरणाने ही व्यवस्था निर्माण केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणाच्या नागपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. महावितरणाने सुरू केलेल्या या केंद्रीय तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ असा आहे. २४ तास ग्राहकांना या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. महावितरणाचे साधारणत: १ कोटी ५८ लाख घरगुती ग्राहक राज्यामध्ये आहे. वीज पुरवठा खंडीत होणे, वीज बिल जास्त येणे, अशा तक्रारी असतात. त्यासाठी त्यांना महावितरणाच्या नजिकच्या कार्यालयात जाण्याऐवजी घरबसल्या या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर ग्राहकांना तक्रार क्रमांक उपलब्ध होतो. तक्रार क्रमांक नोंदविल्याने व तो उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करणे सहज शक्य होत आहे. या क्रमांकावर कुठेही स्पार्कींग होत असल्यास तसेच शॉर्टसर्कीट झाले असल्यास व तत्सम तक्रारी नोंदविणेही शक्य आहे. नवीन वीज कनेक्शन हवे असल्यास योग्य माहिती पुरविली जाते. तक्रारकर्त्या ग्राहकांना त्यांचा ग्राहक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. ग्राहक क्रमांक वीजबिलावर उपलब्ध असतो. ग्राहकांनी त्यांचे तीन मोबाईल क्रमांक किंवा लॅन्डलाईन क्रमांक व ग्राहक क्रमांक एकदाच नोंदवायचा असतो. त्यामुळे ग्राहकांना तक्रार निवारण केंद्रामधून वारंवार ग्राहक क्रमांकाची विचारणा होत नाही. हे सर्व करण्यासाठी एक पैशाचाही खर्च कॉलसाठी येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)