शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विजेसंबंधीची तक्रार करा आता मुंबईत

By admin | Updated: June 13, 2014 00:06 IST

महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून

गडचिरोली : महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून हे केंद्र बंद करण्यात आले आहे. आता वीजेसंबधीची तक्रार मुंबई भांडूप येथील केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण केंद्रातच स्विकारली जाणार आहे. गेल्या पाच महिन्यापासून महावितरणाने ही व्यवस्था निर्माण केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणाच्या नागपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. महावितरणाने सुरू केलेल्या या केंद्रीय तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ असा आहे. २४ तास ग्राहकांना या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. महावितरणाचे साधारणत: १ कोटी ५८ लाख घरगुती ग्राहक राज्यामध्ये आहे. वीज पुरवठा खंडीत होणे, वीज बिल जास्त येणे, अशा तक्रारी असतात. त्यासाठी त्यांना महावितरणाच्या नजिकच्या कार्यालयात जाण्याऐवजी घरबसल्या या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर ग्राहकांना तक्रार क्रमांक उपलब्ध होतो. तक्रार क्रमांक नोंदविल्याने व तो उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करणे सहज शक्य होत आहे. या क्रमांकावर कुठेही स्पार्कींग होत असल्यास तसेच शॉर्टसर्कीट झाले असल्यास व तत्सम तक्रारी नोंदविणेही शक्य आहे. नवीन वीज कनेक्शन हवे असल्यास योग्य माहिती पुरविली जाते. तक्रारकर्त्या ग्राहकांना त्यांचा ग्राहक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. ग्राहक क्रमांक वीजबिलावर उपलब्ध असतो. ग्राहकांनी त्यांचे तीन मोबाईल क्रमांक किंवा लॅन्डलाईन क्रमांक व ग्राहक क्रमांक एकदाच नोंदवायचा असतो. त्यामुळे ग्राहकांना तक्रार निवारण केंद्रामधून वारंवार ग्राहक क्रमांकाची विचारणा होत नाही. हे सर्व करण्यासाठी एक पैशाचाही खर्च कॉलसाठी येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)