शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

प्रवाशांकडून पैसे घेतात; पण तिकीट देत नाही, तक्रार करायची तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 15:39 IST

होतेय सर्रास लुट : दुर्गम भागात बस वाहकांचा असाही प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून दुर्गम भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या; परंतु दुर्गम भागातील नागरिक अशिक्षित असल्याने दुर्गम भागातील प्रवाशांकडून वाहकांद्वारे पैसे वसूल केले जाते. मात्र, तिकीट दिले जात नाही, असा प्रकार नेहमीच होत असतात. एकूणच प्रवाशांकडून पैसे घेतात; पण तिकीट देत नाही, तक्रार करायची तरी कुठे? असा प्रसंग मंगळवारी अहेरी उपविभागाच्या बसफेरीमध्ये प्रवाशांना प्रत्यक्ष अनुभवास आला.

सकाळी दामरंचा येथून येणारी बस भरगच्च प्रवासी घेऊन येत होती. मध्यंतरी असलेल्या गावातील नागरिकांना बसमध्ये उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती त्यामुळे वाहन थांबवले नाही, असे असताना सुद्धा बसवाहकाने अनेक प्रवाशांकडून पैसे घेतले; परंतु तिकीट दिले नाही. भोळ्याभाबळ्या जनतेला कोणाकडे तक्रार करायची व कशी तक्रार करायची, केल्यास काय करावे लागेल याची जाणीव असल्याने मूग गिळून गप्प बसले. काही सुशिक्षित लोक बसमधून उतरून सदर प्रकाराची माहिती बसमध्ये असलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितली. 

राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजना प्रवाशांकरिता राबवून प्रवासी वाढविणे हे एकमेव उद्देश ठेवले आहे; परंतु अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. दुर्गम भागात प्रवासी जास्त राहतात; परंतु वाहकाकडून तिकीट न दिल्याने प्रवाशांची संख्या कमी दिसून येते. त्यामुळे बस तोट्यात आहे असे सांगून काही दिवसांनंतर बसफेरी बंद केली जाते. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्रास होतो. या गैरप्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न आहे. 

आगारप्रमुख म्हणतातलेखी तक्रार द्या अहेरी आगार प्रमुखांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार नाही. वाहन क्रमांक काय? असा उलट सवाल त्यांनी केला. यामुळे वाहकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद तर नाही ना, असाही सवाल व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली