शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

प्रवाशांकडून पैसे घेतात; पण तिकीट देत नाही, तक्रार करायची तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 15:39 IST

होतेय सर्रास लुट : दुर्गम भागात बस वाहकांचा असाही प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून दुर्गम भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या; परंतु दुर्गम भागातील नागरिक अशिक्षित असल्याने दुर्गम भागातील प्रवाशांकडून वाहकांद्वारे पैसे वसूल केले जाते. मात्र, तिकीट दिले जात नाही, असा प्रकार नेहमीच होत असतात. एकूणच प्रवाशांकडून पैसे घेतात; पण तिकीट देत नाही, तक्रार करायची तरी कुठे? असा प्रसंग मंगळवारी अहेरी उपविभागाच्या बसफेरीमध्ये प्रवाशांना प्रत्यक्ष अनुभवास आला.

सकाळी दामरंचा येथून येणारी बस भरगच्च प्रवासी घेऊन येत होती. मध्यंतरी असलेल्या गावातील नागरिकांना बसमध्ये उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती त्यामुळे वाहन थांबवले नाही, असे असताना सुद्धा बसवाहकाने अनेक प्रवाशांकडून पैसे घेतले; परंतु तिकीट दिले नाही. भोळ्याभाबळ्या जनतेला कोणाकडे तक्रार करायची व कशी तक्रार करायची, केल्यास काय करावे लागेल याची जाणीव असल्याने मूग गिळून गप्प बसले. काही सुशिक्षित लोक बसमधून उतरून सदर प्रकाराची माहिती बसमध्ये असलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितली. 

राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजना प्रवाशांकरिता राबवून प्रवासी वाढविणे हे एकमेव उद्देश ठेवले आहे; परंतु अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. दुर्गम भागात प्रवासी जास्त राहतात; परंतु वाहकाकडून तिकीट न दिल्याने प्रवाशांची संख्या कमी दिसून येते. त्यामुळे बस तोट्यात आहे असे सांगून काही दिवसांनंतर बसफेरी बंद केली जाते. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्रास होतो. या गैरप्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न आहे. 

आगारप्रमुख म्हणतातलेखी तक्रार द्या अहेरी आगार प्रमुखांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार नाही. वाहन क्रमांक काय? असा उलट सवाल त्यांनी केला. यामुळे वाहकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद तर नाही ना, असाही सवाल व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली