शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

ऐन दिवाळीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देमोटारमध्ये बिघाड : सणाच्या कालावधीत पाण्यासाठी महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ऐन दिवाळीच्या कालावधीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यामुळे एटापल्लीवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजना बंद असल्याबाबत नगर पंचायतीचे अभियंता नंदनवार यांना विचारणा केली असता, मोटार नादुरूस्त असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. दोन दिवसात मोटार सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.नळांद्वारे पाणीपुरवठा ज्या दिवशी होत नाही, त्या दिवशी महिला हातपंपाचे पाणी भरतात. मात्र एटापल्ली नगर पंचायतीने हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेक हातपंप बंद आहेत, असा आरोप मनोज वरगंटीवार यांच्यासह नागरिकांकडून होत आहे. आठ वर्षांपूर्वी योजना बांधण्यात आली. त्यानंतर शहराचा विस्तार दरवर्षी होत आहे. नवीन वस्त्या वाढत आहेत. मात्र या नवीन वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली नाही.एटापल्ली नगर पंचायतीअंतर्गत एटापल्ली टोला, कृष्णार, जीवनगट्टा, मरपल्ली, वासामुंडी या गावांचा समावेश होतो. मात्र या गावांना नळ योजनेची सुविधा उपलब्ध नाही. केवळ एटापल्ली शहरालाच नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. विशेष म्हणजे एटापल्ली येथे ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा योजना बांधण्यात आली. नगर पंचायतीची निर्मिती होेऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी होत चालला आहे. मात्र या योजनेत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. डुम्मी नाल्यावरच दोन विहिरी खोदल्या आहेत. मात्र मोटार बसविणे, विद्युत पुरवठा आदी कामे करण्यात आली नाही. ज्या विहिरीतून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे ती विहीर आकाराने लहान आहे. पाणी पुरत नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.बांडे नदी भागवू शकते अनेक गावांची तहानबांडे ही एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी अनेक गावांना वळसा घालून पुढे जाते. विशेष म्हणजे जंगलातून वाहत असल्याने या नदीला बारमाही पाणी राहते. एटापल्लीपासून ही नदी जेमतेम पाच किमी अंतरावर आहे. या नदीवर पाणीपुरवठा योजना तयार केल्यास एटापल्लीसह तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांची तहान भागू शकते. सर्वांसाठी एक संयुक्त पाणीपुरवठा योजना बांधल्यास ती यशस्वी होऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीकपात