शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विद्यार्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम

By admin | Updated: October 16, 2014 23:25 IST

महात्मा गांधी जयंतीपासून सुरू झालेली स्वच्छता मोहीम शाळांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून चालूच ठेवली आहे. त्यामुळे गाव नीटनेटके होण्यास मदत होत आहे.

गडचिरोली : महात्मा गांधी जयंतीपासून सुरू झालेली स्वच्छता मोहीम शाळांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून चालूच ठेवली आहे. त्यामुळे गाव नीटनेटके होण्यास मदत होत आहे. जांभळी येथील सिंधूताई पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोगाव- येथील विद्यार्थ्यांनी मंगळवारी गोगाव येथे स्वच्छता मोहीम राबविली. विद्यार्थ्यांनी स्वत: हातात झाडू धरून गावातील मुख्य चौकाची साफसफाई केली व गावकऱ्यांना स्वच्छता पाळण्याविषयी आवाहन केले. विद्यार्थ्यांनी साफसफाईला सुरूवात केल्यानंतर गावातील महिलांनीही त्यांना मदत करत साफसफाई केली. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.ही मोहीम प्राचार्य कविता पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात प्रा. मुनघाटे, कढव, बैस, बोमनवार, तावाडे, बारसागडे, मलोडे मांदाडे, पिल्लेवान यांनी राबविली. जय पेरसापेन विद्यालय जांभळी- येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावातून रॅली काढली. रॅलीमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता. रॅलीनंतर विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास दाजगाये होते. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने घर व परिसरात स्वच्छता राखावी, प्लास्टीकचे अनेक वर्ष होत नसल्यामुळे प्लास्टीकच्या कचऱ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टीकचा वापर मर्यादित प्रमाणात करावा, असे आवाहन केले. संचालन अवथरे तर आभार खांडरे यांनी मानले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खामतळा- येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी गावातून प्रभातफेरी काढली. प्रभातफेरीदरम्यान स्वच्छ भारत व स्वच्छ शाळा व घोषवाक्यांच्या सहाय्याने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एम. जनबंधू होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश मडावी, हेमराज सहारे, चावरे, मेश्राम, ठाकरे, सिडाम आदी उपस्थित होते.