शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

रेगुंठा परिसरातील नागरिक तेलंगणातील कव्हरेजवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:39 IST

सिरोंचा : तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे ...

सिरोंचा : तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे बीएसएनएलचे टॉवर उभारून फोर-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रेगुंठा परिसरात कोटापल्ली, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा, मूलदिम्या, येल्ला, पिरमिडा, दर्शेवाडा, पर्सेवाडा, चिक्याला, बोकटगुडम, आदी गावांचा समावेश आहे. या गावांतील बीएसएनएल ग्राहकांना तेलंगणा राज्यातील कव्हरेजवर अवलंबून राहावे लागत आहे. रेगुंठा येथून बऱ्याच अंतरावर तेलंगणा परिसर आहे. नागरिकांसाठी मोबाईल ही अत्यावश्यक झाली आहे. अनेकजण ऑनलॉईन कामे मोबाईलवरच करतात. ग्रामीण भागातही वापर वाढला आहे. त्यामुळे रेगुंठा येथे बीएसएनएल टॉवर निर्माण करून फोर-जी सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

झिंगानूर परिसरात दूरसंचार सेवेची समस्या बिकट बनली आहे. या भागात माेबाईलधारक वाढले असले तरी पाहिजे तशी सेवा मिळत नसल्याने संवाद साधण्यास अडचणी येत आहेत.