शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.

ठळक मुद्देखंडाळा गावात विजेची समस्या तीव्र्र : शिपायाकडे निवेदन ठेवून संतप्त नागरिक परतले

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावालगतच्या खंडाळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असून लपंडावही वाढला आहे. ही समस्या गंभीर झाल्याने गावातील नागरिकांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास भेंडाळा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या कार्यालयात धडक दिली.दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.निवेदनावर कैलास सातपुते, संदीप सातपुते, श्रीनिवास सातपुते, आकाश सातपुते, तानाजी चलाख, लालाजी सातपुते, विकास चलाख, हिवराज सातपुते, आयुश सातपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.आष्टी भागात विजेचा लपंडाव, नागरिक हैराणजिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी परिसरात गेल्या चार महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळेला वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने आष्टी गावातील व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.सध्या इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. मात्र रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अभ्यास होत नसल्याने गुणांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अनेक नागरिक व पालकांनी ही समस्या मांडली होती. मात्र कार्यवाही झाली नाही.परिसरातील रामपूर, कोनसरी, रामकृष्णपूर, अनखोडा, येनापूर, अडपल्ली, गुंडापल्ली, चंदनखेडी, चौडमपल्ली, जयरामपूर व सिंघमपल्ली आदी गावात शिकारीचे प्रमाण वाढली असल्याची चर्चा सुरू आहे. तारेवरील वीज प्रवाह जंगलात सोडून शिकार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. वन्यप्राणी शिकारीचे प्रमाण वाढल्यामुळेच वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण