शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.

ठळक मुद्देखंडाळा गावात विजेची समस्या तीव्र्र : शिपायाकडे निवेदन ठेवून संतप्त नागरिक परतले

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावालगतच्या खंडाळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असून लपंडावही वाढला आहे. ही समस्या गंभीर झाल्याने गावातील नागरिकांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास भेंडाळा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या कार्यालयात धडक दिली.दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.निवेदनावर कैलास सातपुते, संदीप सातपुते, श्रीनिवास सातपुते, आकाश सातपुते, तानाजी चलाख, लालाजी सातपुते, विकास चलाख, हिवराज सातपुते, आयुश सातपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.आष्टी भागात विजेचा लपंडाव, नागरिक हैराणजिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी परिसरात गेल्या चार महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळेला वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने आष्टी गावातील व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.सध्या इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. मात्र रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अभ्यास होत नसल्याने गुणांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अनेक नागरिक व पालकांनी ही समस्या मांडली होती. मात्र कार्यवाही झाली नाही.परिसरातील रामपूर, कोनसरी, रामकृष्णपूर, अनखोडा, येनापूर, अडपल्ली, गुंडापल्ली, चंदनखेडी, चौडमपल्ली, जयरामपूर व सिंघमपल्ली आदी गावात शिकारीचे प्रमाण वाढली असल्याची चर्चा सुरू आहे. तारेवरील वीज प्रवाह जंगलात सोडून शिकार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. वन्यप्राणी शिकारीचे प्रमाण वाढल्यामुळेच वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण