शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

रासायनिक खतांमुळे शेतजमिनीचा पोत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

चामोर्शी : नवनवे तंत्रज्ञान वापरून शेतकरी शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. तंत्रज्ञानासोबतच रासायनिक खते-कीटकनाशके आदींचा वापर प्रचंड प्रमाणात ...

चामोर्शी : नवनवे तंत्रज्ञान वापरून शेतकरी शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. तंत्रज्ञानासोबतच रासायनिक खते-कीटकनाशके आदींचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेतजमिनीचा पोत दिवसेंदिवस घसरत आहे. जमिनी बंजर होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करीत आहेत त्यामुळे जमिनीतील पोषक तत्त्वे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे पाळत होते . जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषकतत्त्व मिळत होते त्यामुळे जमिनीचा पोत टिकून होता . या तत्त्वामुळे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती, शिवाय शेतीचा पोत वाढत होता. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. उत्पादन दर्जा चांगला राहत होता .त्यामुळे पौष्टिक अन्न मिळण्यास मदत व्हायची; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होता; परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाठ वापर केला जात आहे. परिणामी जमिनीतील आवश्यक पाेषण तत्त्वे नष्ट होत आहेत. सध्या पिकांना रासायनिक खते मोठ्या प्रमाणात टाकली जात असल्याने उत्पादनावरही परिणाम होत आहे. जिल्ह्यात धान, सोयाबीन व कापूस आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातो आहे. सिंचनाअभावी चार महिने शेती पडीत असते. जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके शेतकरी घेतात. उन्हाळ्यात धान पिकासाठी सिंचनाची सोय नसल्याने चार महिने शेती पडीक असते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते त्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर रब्बी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व बोअरवेलची व्यवस्था आहे ते भाजीपाला घेतात. परंतु जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात रब्बी पिके निघाल्यानंतर जवळपास चार महिने जिल्ह्यतील शेती पडीक राहते.

शेतकऱ्यांची कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात धाव

शेतकरी कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यांत, बाहेर राज्यांत जात आहे. हरभरा, सोयाबीन, गहू कापणी व मळणी तसेच मिरची तोडण्यासाठी माेठा वर्ग गावाबाहेर गेल्याचे चित्र दिसून येत आहे .

जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके शेतकरी घेतात. उन्हाळ्यात धान पिकासाठी सिंचनाची सोय नसल्याने चार महिने शेती पडीक असते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. त्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर रब्बी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, बोअरवेलची व्यवस्था आहे ते भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करतात; परंतु जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रब्बी पिके निघाल्यानंतर जवळपास चार महिने जिल्ह्यातील शेती पडीत राहते. त्यावेळी शेतकरी कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात व बाहेर राज्यात जात असल्याचे दिसून येते.