शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी

By admin | Updated: April 16, 2015 01:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात ३३७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दोन टप्प्यात या

ज्वर वाढला : आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात निवडणुकीसाठी चुरस; अनेक तरूण नव्या चेहऱ्यांसह महिलाही रिंगणातगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ३३७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दोन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया १५ एप्रिलला समाप्त झाली. अनेक ठिकाणी ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये चुरस दिसून आली. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, कोरची, मुलचेरा, कुरखेडा आदी तालुक्यात उमेदवारांची भाऊगर्दी दिसून आली.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात आठ तालुक्यातील २६७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. दुसऱ्या टप्प्यातील ग्रा. पं. निवडणुकीसाठी ९ एप्रिलपासून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुलचेरा, चामोर्शी, गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची आदी आठ तालुक्यातील २६७ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी १३ एप्रिलपर्यंत एकूण दोन हजार ५०३ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. १५ एप्रिल ही ग्राम पंचायत निवडणुकीत नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. गडचिरोली तालुक्यात ४६ सार्वत्रिक व चार ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहे. या ग्रा. पं. निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी जवळपास ७१६ नामांकन अर्ज दाखल झाले. अखेरचा दिवस असल्याने गडचिरोलीच्या तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची प्रचंड गर्दी दिसून आली. गडचिरोली तालुक्यात १५१ प्रभागात एकूण ३९९ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. चामोर्शी तालुक्यात ४९ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी ६८९ नामांकन अर्ज दाखल झाले. यापूर्वी १३ एप्रिलपर्यंत चामोर्शी तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीसाठी ८६८ नामांकन अर्ज दाखल झाले. एकट्या चामोर्शी ग्राम पंचायतीसाठी ९ एप्रिलपासून बुधवारी शेवटच्या दिवसापर्यंत १०९ नामांकन अर्ज दाखल झाले असल्याची माहिती आहे. देसाईगंज तालुक्यात एकूण १८ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या ग्रा. पं. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी २६३ नामांकन अर्ज दाखल झाले. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत नागरिकांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी येथील तहसील कार्यालयात एकच गर्दी केली होती. ९ ते १३ एप्रिलपर्यंत देसाईगंज तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीसाठी ३०० नामांकन अर्ज दाखल झाले होते. आता १८ ग्रा. पं. साठी एकूण ५११ नामांकन अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आरमोरी तालुक्यात एकूण ३२ ग्राम पंचायतीच्या निवडणुका होऊ घातले आहेत. यात ३०२ जागांवर मतदारांना उमेदवार निवडून द्यायचे आहेत. ३२ ग्रा. पं. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी एकूण ३३४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. ३२ ग्रा. पं. निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ९७६ नामांकन अर्ज दाखल झाले आहे. आरमोरी तालुक्यात एकूण १०८ प्रभागासाठी ३०२ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यामध्ये अनुसूचित जातीच्या ३२, अनुसूचित जमातीच्या ९४, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या ५९ व सर्वसाधारणच्या ११७ जागांसाठी ग्राम पंचायत निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण १२० मतदान केंद्राची व्यवस्था राहणार आहे. जिल्हाभरात निवडणुकीचा ज्वर वाढला आहे.मुलचेरा तालुक्यातील १३ ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी १३४ नामांकन अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ४८ प्रभागासाठी एकूण ३५० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. देवदा व वेंगनूर या दोन ग्रा. पं. ची पोटनिवडणूक होणार आहे. देवदा ग्रा. पं. साठी बुधवारी सहा नामांकन अर्ज दाखल झाले. तर वेंगनूर ग्रा. पं. साठी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)