शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोलीत एसडीओची पदे रिक्तच

By admin | Updated: March 25, 2015 01:42 IST

गडचिरोली या नक्षलप्रभावित जिल्ह्यात सहा महसूल विभाग आहेत. यापैकी तीन महसूल विभागात सध्या उपविभागीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

गडचिरोली : गडचिरोली या नक्षलप्रभावित जिल्ह्यात सहा महसूल विभाग आहेत. यापैकी तीन महसूल विभागात सध्या उपविभागीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एटापल्ली या नक्षलग्रस्त भागात मागील दीड वर्षांपासून एसडीओ नाही. त्यांचा कारभार अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे. तर गडचिरोली व चामोर्शी येथील एसडीओंचे पदे मागील दोन महिन्यांपासून रिक्त आहे. नवीन राज्य सरकारचे गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पुण्या, मुंबईचे अधिकारी गडचिरोलीत नियुक्ती झाल्यावर येत नाही. हा पायंडा नवीन सरकारच्याही काळात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. एटापल्लीच्या उपविभागीय अधिकारी पदावर पुणे येथील अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. मात्र ते येथे आले नाही. त्यांच्यावर अद्याप शासनाने कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली हे महसूल उपविभाग आहे. सध्या चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली यातील एसडीओंची पदे रिक्त आहे. चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी देवेंद्रसिंह यांची अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. गडचिरोलीचे पी. शिवशंकर यांची कोल्हापूर महानगर पालिकेत बदली झाली. तर एटापल्लीचे एसडीओ चंद्रभान पराते यांची गोंडपिंपरी येथे दीड वर्षापूर्वी बदली झाली. परंतु या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवे अधिकारी अद्याप नियुक्त करण्यात आले नाही. पराते यांच्या जागेवर पुणे येथील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते येथे रूजू होण्यासाठी आले नाही. तर चामोर्शी व गडचिरोली येथून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली. परंतु त्यांच्या जागेवर नवीन एसडीओ दिले नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून हे पद रिक्त आहेत. एटापल्लीचा पदभार अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, चामोर्शीचा पदभार जिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी तर गडचिरोलीचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी सांभाळत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड भार वाढला आहे. एसडीओंकडे विविध प्रमाणपत्र देण्याचे अधिकार असल्याने तेच मुख्यालयी नसल्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे. दुर्गम भागात एसडीओसारख्या पदावर नियमित अधिकारी नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.