शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोलीत एसडीओची पदे रिक्तच

By admin | Updated: March 25, 2015 01:42 IST

गडचिरोली या नक्षलप्रभावित जिल्ह्यात सहा महसूल विभाग आहेत. यापैकी तीन महसूल विभागात सध्या उपविभागीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

गडचिरोली : गडचिरोली या नक्षलप्रभावित जिल्ह्यात सहा महसूल विभाग आहेत. यापैकी तीन महसूल विभागात सध्या उपविभागीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एटापल्ली या नक्षलग्रस्त भागात मागील दीड वर्षांपासून एसडीओ नाही. त्यांचा कारभार अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे. तर गडचिरोली व चामोर्शी येथील एसडीओंचे पदे मागील दोन महिन्यांपासून रिक्त आहे. नवीन राज्य सरकारचे गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पुण्या, मुंबईचे अधिकारी गडचिरोलीत नियुक्ती झाल्यावर येत नाही. हा पायंडा नवीन सरकारच्याही काळात सुरूच असल्याचे दिसून येत आहे. एटापल्लीच्या उपविभागीय अधिकारी पदावर पुणे येथील अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. मात्र ते येथे आले नाही. त्यांच्यावर अद्याप शासनाने कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली हे महसूल उपविभाग आहे. सध्या चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली यातील एसडीओंची पदे रिक्त आहे. चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी देवेंद्रसिंह यांची अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. गडचिरोलीचे पी. शिवशंकर यांची कोल्हापूर महानगर पालिकेत बदली झाली. तर एटापल्लीचे एसडीओ चंद्रभान पराते यांची गोंडपिंपरी येथे दीड वर्षापूर्वी बदली झाली. परंतु या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवे अधिकारी अद्याप नियुक्त करण्यात आले नाही. पराते यांच्या जागेवर पुणे येथील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते येथे रूजू होण्यासाठी आले नाही. तर चामोर्शी व गडचिरोली येथून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली. परंतु त्यांच्या जागेवर नवीन एसडीओ दिले नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून हे पद रिक्त आहेत. एटापल्लीचा पदभार अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, चामोर्शीचा पदभार जिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी तर गडचिरोलीचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी सांभाळत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड भार वाढला आहे. एसडीओंकडे विविध प्रमाणपत्र देण्याचे अधिकार असल्याने तेच मुख्यालयी नसल्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे. दुर्गम भागात एसडीओसारख्या पदावर नियमित अधिकारी नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.