शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे वनविभागामार्फत एकूण कक्ष क्रमांक ५४६, ५४७, ४७३ असे तीन कक्ष क्रमांक आहेत. या तीनही कक्ष क्रमांकाचे अधिकार बोदालदंड ग्रामपंचायतीला देण्यात यावे, रीठी गावाचे क्षेत्र सातबारानुसार १.१० हेक्टर आर. जमीन ग्रामपंचायतीला देण्यात यावी.

ठळक मुद्देबोदालदंडवासीय आक्रमक : डीएफओंच्या लेखी आश्वासनाने आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : अनेकदा शासनाकडे निवेदन देवून सुद्धा समस्या सुटली नाही तसेच वनविभागाच्या निष्क्रीयपणाला कंटाळून ग्रामपंचायत बोदालदंड अंतर्गत येत असलेल्या बोदालदंड, बेलारगोंदी व बिजेपार या तीन गावातील नागरिकांनी सोमवारी झंकारगोंदी फाट्याजवळ विविध मागण्यांना घेऊन चक्काजाम आंदोलन केले. तहसीलदारांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलन सुरू झाल्याच्या काही वेळानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी आताच मोजमाप सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे वनविभागामार्फत एकूण कक्ष क्रमांक ५४६, ५४७, ४७३ असे तीन कक्ष क्रमांक आहेत. या तीनही कक्ष क्रमांकाचे अधिकार बोदालदंड ग्रामपंचायतीला देण्यात यावे, रीठी गावाचे क्षेत्र सातबारानुसार १.१० हेक्टर आर. जमीन ग्रामपंचायतीला देण्यात यावी. वन विभागामार्फत झालेल्या कामाची योग्य चौकशी करून काम करून घेणाऱ्या वनरक्षकाला तत्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. परंतु फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले नंतर उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांच्या आदेशाने बेळगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी २० ऑक्टोंबरपासून मोजणीला सुरुवात करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीनही गावातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम