शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

झंकारगोंदीजवळ शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे.  गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा धानखरेदीची मर्यादा १७ क्विंटल करण्यात यावी.  तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रांवर रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार असून या केंद्रांची खरेदी मर्यादा ३०३६  क्विंटल आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या कोरची येथील झंकारगोंदीजवळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. १) बेमुदत चक्काजामआंदोलन केले. या आंदोलनाला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार सी. आर. भंडारी व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असल्याने रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी कृषी विभागाचे अधिकारी लाकेश कटरे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता मिथिन मुरकुटे, सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे यांनीही भेट देऊन चर्चा केली. पण शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनस्थळी येऊन चार दिवसांत संपूर्ण मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकरी परिषदेचे हे बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले.कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे. गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा धानखरेदीची मर्यादा १७ क्विंटल करण्यात यावी.  तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रांवर रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार असून या केंद्रांची खरेदी मर्यादा ३०३६  क्विंटल आहे. ही मर्यादा वाढवून ८ हजार क्विंटल प्रतिकेंद्र करण्यात यावी. खरीप हंगामातील धान खरेदीचे बोनस तत्काळ जमा करावे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  बेडगाव पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक नितीश पोटे, अनिल नानिकर यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाचे नेतृत्व नंदकिशोर वैरागडे, सुरेश काटेंगे, रामसुराम काटेंगे, अशोक गावतुरे, केशव लेनगुरे, आसाराम शेंडे, सियाराम हलामी, रंजित बागडेहरीया, भावराव मानकर, मेहरसिंग काटेंगे, सुनील सयाम, रुपेश गंगबोईर, रूपराम देवांगन, धनिराम हीळामी, सुखराम राऊत, महादेव बन्सोड, रामाधिन ताराम, तुलसीदास मडावी, शंकर जनबंधू यांनी केले.

अशा होत्या मागण्या-    रब्बी हंगामात एकूण १७ क्विंटल धान खरेदी केंद्र करावे, बेतकाठी व बेळगाव या दोन गावांसाठी आठ हजार क्विंटलची धान खरेदीची परवानगी द्यावी, खरीप हंगामातील धानाचे बोनस तत्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे जोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरला त्यांची जोडणी तत्काळ करण्यात यावी, अशा विविध मुद्द्यांसह हे आंदोलन करण्यात आले.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामagitationआंदोलन