शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

झंकारगोंदीजवळ शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे.  गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा धानखरेदीची मर्यादा १७ क्विंटल करण्यात यावी.  तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रांवर रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार असून या केंद्रांची खरेदी मर्यादा ३०३६  क्विंटल आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या कोरची येथील झंकारगोंदीजवळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. १) बेमुदत चक्काजामआंदोलन केले. या आंदोलनाला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार सी. आर. भंडारी व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. सकाळी १० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असल्याने रस्त्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी कृषी विभागाचे अधिकारी लाकेश कटरे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता मिथिन मुरकुटे, सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे यांनीही भेट देऊन चर्चा केली. पण शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनस्थळी येऊन चार दिवसांत संपूर्ण मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकरी परिषदेचे हे बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले.कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे. गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा धानखरेदीची मर्यादा १७ क्विंटल करण्यात यावी.  तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रांवर रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार असून या केंद्रांची खरेदी मर्यादा ३०३६  क्विंटल आहे. ही मर्यादा वाढवून ८ हजार क्विंटल प्रतिकेंद्र करण्यात यावी. खरीप हंगामातील धान खरेदीचे बोनस तत्काळ जमा करावे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  बेडगाव पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक नितीश पोटे, अनिल नानिकर यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाचे नेतृत्व नंदकिशोर वैरागडे, सुरेश काटेंगे, रामसुराम काटेंगे, अशोक गावतुरे, केशव लेनगुरे, आसाराम शेंडे, सियाराम हलामी, रंजित बागडेहरीया, भावराव मानकर, मेहरसिंग काटेंगे, सुनील सयाम, रुपेश गंगबोईर, रूपराम देवांगन, धनिराम हीळामी, सुखराम राऊत, महादेव बन्सोड, रामाधिन ताराम, तुलसीदास मडावी, शंकर जनबंधू यांनी केले.

अशा होत्या मागण्या-    रब्बी हंगामात एकूण १७ क्विंटल धान खरेदी केंद्र करावे, बेतकाठी व बेळगाव या दोन गावांसाठी आठ हजार क्विंटलची धान खरेदीची परवानगी द्यावी, खरीप हंगामातील धानाचे बोनस तत्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे जोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरला त्यांची जोडणी तत्काळ करण्यात यावी, अशा विविध मुद्द्यांसह हे आंदोलन करण्यात आले.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामagitationआंदोलन