शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

केंद्रीय पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

आरमाेरी : नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करण्यासाठी गडचिराेली जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरमाेरी-गडचिराेली मार्गावरील देऊळगावनजीकच्या रस्त्यालगत ...

आरमाेरी : नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करण्यासाठी गडचिराेली जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरमाेरी-गडचिराेली मार्गावरील देऊळगावनजीकच्या रस्त्यालगत असलेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जवळपास १५ मिनीटाच्या भेटीत केंद्रीय पथकाने खाेब्रागडी नदीलगत शेताची पाहणी केली. यावेळी देऊळगाव येथील शेतकरी प्रकाश ठाकरे व इतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने धानपीक बुडाले. नुकसान हाेऊनही शासनाकडून भरीव मदत मिळाली नाही, असे सांगत शेतकऱ्यांनी बॅंकेचे पासबुक पथकातील अधिकाऱ्यांना दाखविले.

महापुराने ऑगस्ट महिन्यात धान पीक बुडाले तर त्याची कापणी केली काय, असा प्रश्न पथकाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. नाेव्हेंबरमध्ये कापणी केल्याचे एका शेतकऱ्यांनी सांगितले. तेव्हा ऑगस्टमध्ये धान बुडाल्यानंतर कापणी कशी केली, असा प्रश्न पथकाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. धानपीक गेले परंतु जनावरांना चारा व्हावा, यासाठी नाेव्हेंबर महिन्यात कापणी केल्याची माहिती शेतकऱ्यांनी पथकाला दिली. मागील वर्षी धानाचे किती उत्पादन झाले व यावर्षी किती उत्पादन झाले, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला. मागील वर्षी सव्वा एकरात २५ पाेते धान झाले. मात्र या वर्षी दाेन ते तीन पाेते हाती लागले, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागणीवर नुकसानग्रस्तांना मदत मिळेल, असे पथकाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.