शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचात रेती तस्करीवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: February 19, 2017 01:14 IST

गोदावरी नदी घाटावरून तेलंगणा राज्यात होणारी रेतीची तस्करी थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने गोदावरी नदीच्या पुलावर

महसूल प्रशासनाचा निर्णय : गोदावरी पुलावर लागले कॅमेरे सिरोंचा : गोदावरी नदी घाटावरून तेलंगणा राज्यात होणारी रेतीची तस्करी थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने गोदावरी नदीच्या पुलावर चौकीनजीक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तहसील कार्यालयात यासाठी स्वतंत्र मॉनिटरींग कक्ष निर्माण करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रकवर नजर राहणार असल्याने रेती तस्करीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तेलंगणा व महाराष्ट्र यांच्या सीमा रेषेवर असलेल्या गोदावरी नदीमध्ये तेलंगणा राज्याच्या बाजुला पाणी आहे. तर महाराष्ट्राच्या बाजुला रेती असल्याने या रेतीवर महाराष्ट्र शासनाचा अधिकार आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील रेती घाटांची विक्री गडचिरोली महसूल विभागाने केली आहे. गोदावरी नदीवरील पूल झाल्यापासून मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यात अवैधरितीने रेतीची तस्करी केली जात आहे. आजपर्यंत महसूल प्रशासनाने अनेकवेळा कारवाई करून रेती तस्करांच्या मुस्क्या दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही रेती तस्करीवर पूर्णपणे आळा घालता येणे शक्य झाले नाही. गोदावरी पुलावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर ठेवता यावी, यासाठी महसूल प्रशासनाने आता पुलानजीक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरांचे मॉनिटरींग कक्ष सिरोंचा तहसील कार्यालयात उभारण्यात आले आहे. या भागातून जाणाऱ्या प्रत्येक ट्रकला सीसीटीव्हीच्या नजरेतूनच जावे लागणार आहे. प्रत्येक ट्रकची या ठिकाणी नोंद घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरा खांबावर अगदी वरच्या बाजुला लावण्यात आला असल्याने ओव्हरलोड रेती वाहतुकीवरही नियंत्रण ठेवण्यास फार मोठी मदत होणार आहे. नियमांचा भंग करणाऱ्या सदर ट्रकवर कारवाई करण्यास सीसीटीव्ही कॅमेरांमुळे सोपे जाणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी) धर्मकाटाही लागणार काही ट्रकमधून ओव्हरलोड रेतीची वाहतूक केली जात असल्याचे महसूल प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोदावरी नदी पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलावरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी तेलंगणा राज्याने त्यांच्या सीमेवर धर्मकाटा उभारला आहे. धर्मकाट्यावर ट्रकचे वजन केल्यानंतरच सदर ट्रक पुलावरून सोडला जातो. महाराष्ट्राच्या सीमेवरही धर्मकाटा लावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.