शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

कालवा फुटल्याने पीक धोक्यात

By admin | Updated: August 30, 2014 01:25 IST

तालुक्यातील गोगाव- अडपल्ली येथील उपसा जलसिंचन योजनेचा कालवा मागील अनेक दिवसांपासून फुटला आहे. मात्र सदर कालवा दुरूस्त करण्याकडे

गडचिरोली : तालुक्यातील गोगाव- अडपल्ली येथील उपसा जलसिंचन योजनेचा कालवा मागील अनेक दिवसांपासून फुटला आहे. मात्र सदर कालवा दुरूस्त करण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने शेकडो एकरातील धानपीक धोक्यात आले. सदर कालवा तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अडपल्ली व गोगाव येथील शेतीला जलसिंचनाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाने वैनगंगा नदीवर उपसा जलसिंचन योजनेचे १० वर्षापूर्वीच बांधकाम केले. मात्र सदर योजनेत बिघाड निर्माण झाल्याने सुमारे ६ ते ७ वर्ष सदर योजना बंद होती. योजना सुरू करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने, निवेदन दिल्यानंतर योजनेतील बिघाड दुरूस्त करून योजना चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. तेव्हापासून या योजनेचे पाणी हजारो हेक्टर शेतीला पुरविले जात आहे. जलसिंचन योजनेच्या चौथ्या क्रमांकाच्या कालव्याला पंढरी मंगर यांच्या शेताजवळ भलेमोठे भगदाड पडले आहे. सदर कालवा या ठिकाणी ३ वर्षापूर्वीच फुटला होता. तेव्हापासून शेतकऱ्यांना पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याने कालवा दुरूस्त करण्याची मागणी केली जात होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यावर्षीच्या पावसाळ्यातून या भगदाडातून जास्तच पाणी वाहायला लागले. तरीही पाटबंधारे विभागाने कालव्याची दुरूस्ती केली नाही. २७ आॅगस्ट रोजी या ठिकाणी मोठा भगदाड पडल्याने कालव्यातील पूर्ण पाणी बाजूला वाहून जात आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने शेतीला पाणी देणे आवश्यक झाले आहे. मात्र पाणीच मिळत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला आहे. आणखी काही दिवस सदर कालवा दुरूस्त न करण्यात आल्यास शेकडो हेक्टरातील धानपीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून वार्षिक पाणसारा वसूल केला जातो. पाणसाऱ्याचे लाखो रूपये पाटबंधारे विभागाकडे गोळा होतात. या रक्कमेतून उपसा सिंचन योजनेची देखभाल करणे सहज शक्य आहे. तरीही पाटबंधारे विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदर कालवा तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी दुधराम म्हशाखेत्री, उमाकांत चौधरी, दिनकर चौधरी, बाळकृष्ण म्हशाखेत्री, मधुकर चौधरी, भक्तदास चौधरी, अनिल म्हशाखेत्री, निलकंठ भोयर, केशव भोयर, दिवाकर म्हशाखेत्री, सोमा खेवले, खुशाल खेवले, मधु पांडव आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)