शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

कालवा फुटल्याने पीक धोक्यात

By admin | Updated: August 30, 2014 01:25 IST

तालुक्यातील गोगाव- अडपल्ली येथील उपसा जलसिंचन योजनेचा कालवा मागील अनेक दिवसांपासून फुटला आहे. मात्र सदर कालवा दुरूस्त करण्याकडे

गडचिरोली : तालुक्यातील गोगाव- अडपल्ली येथील उपसा जलसिंचन योजनेचा कालवा मागील अनेक दिवसांपासून फुटला आहे. मात्र सदर कालवा दुरूस्त करण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने शेकडो एकरातील धानपीक धोक्यात आले. सदर कालवा तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अडपल्ली व गोगाव येथील शेतीला जलसिंचनाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाने वैनगंगा नदीवर उपसा जलसिंचन योजनेचे १० वर्षापूर्वीच बांधकाम केले. मात्र सदर योजनेत बिघाड निर्माण झाल्याने सुमारे ६ ते ७ वर्ष सदर योजना बंद होती. योजना सुरू करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने, निवेदन दिल्यानंतर योजनेतील बिघाड दुरूस्त करून योजना चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. तेव्हापासून या योजनेचे पाणी हजारो हेक्टर शेतीला पुरविले जात आहे. जलसिंचन योजनेच्या चौथ्या क्रमांकाच्या कालव्याला पंढरी मंगर यांच्या शेताजवळ भलेमोठे भगदाड पडले आहे. सदर कालवा या ठिकाणी ३ वर्षापूर्वीच फुटला होता. तेव्हापासून शेतकऱ्यांना पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याने कालवा दुरूस्त करण्याची मागणी केली जात होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यावर्षीच्या पावसाळ्यातून या भगदाडातून जास्तच पाणी वाहायला लागले. तरीही पाटबंधारे विभागाने कालव्याची दुरूस्ती केली नाही. २७ आॅगस्ट रोजी या ठिकाणी मोठा भगदाड पडल्याने कालव्यातील पूर्ण पाणी बाजूला वाहून जात आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने शेतीला पाणी देणे आवश्यक झाले आहे. मात्र पाणीच मिळत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला आहे. आणखी काही दिवस सदर कालवा दुरूस्त न करण्यात आल्यास शेकडो हेक्टरातील धानपीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून वार्षिक पाणसारा वसूल केला जातो. पाणसाऱ्याचे लाखो रूपये पाटबंधारे विभागाकडे गोळा होतात. या रक्कमेतून उपसा सिंचन योजनेची देखभाल करणे सहज शक्य आहे. तरीही पाटबंधारे विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदर कालवा तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी दुधराम म्हशाखेत्री, उमाकांत चौधरी, दिनकर चौधरी, बाळकृष्ण म्हशाखेत्री, मधुकर चौधरी, भक्तदास चौधरी, अनिल म्हशाखेत्री, निलकंठ भोयर, केशव भोयर, दिवाकर म्हशाखेत्री, सोमा खेवले, खुशाल खेवले, मधु पांडव आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)