शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या जिल्ह्यातील ८ जणांवर गुन्हे दाखल; आक्षेपार्ह पोस्ट करणे पडेल महागात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:16 IST

वापर काळजीपूर्वक हवा : नागपूर दंगलीनंतर सायबर सेलची करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून मोठी दंगल झाली होती. ही दंगल होण्यामागे सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्ट कारणीभूत ठरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे राज्यभरातील पोलिसांनी आता सोशल मीडियावरील पोस्टवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या जवळपास ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोष सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलद्वारे फेसबुक, व्हॉटसअॅप द्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वादग्रस्त पोस्ट आढळल्यास लगेच ती डिलीट केली जात आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात इन्स्टाग्राम, फेसबूक व द्विटरचा उपयोग करणाऱ्या युवकांची संख्या अलिकडे बरीच वाढली आहे. त्यामुळे युवकांनी सावधगिरी बाळगत याचा वापर करणे गरजेचे आहे.

हातात शस्त्रे घेऊन फोटो, रील्स होतात अपलोडसोशल मीडियावर तरुण अॅक्टिव्ह झाले आहेत. अनेकजण हातात खंजर, तलवार आणि देशी कट्टे घेऊन फोटो आणि रूल्स तयार करतात. त्यानंतर एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे या रील्स सोशल मीडियावर टाकण्यात येतात. अशा प्रकारे त्या त्या भागात आपली किती दहशत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येतो; परंतु पोलिसांनी आता अशा प्रकारचे दहशतीचे व्हिडीओ आणि रील्स टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कुरखेडात पोलिसांनी दिली होती समजसोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या कुरखेडा शहरातील युवकांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी समज दिली होती. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला.

१९ इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंटची तपासणीसोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने आतापर्यंत जवळपास १९ इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊंटवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याचे उघडकीस आले असून त्याची तपासणी केली जात आहे. या सर्व पोस्ट टाकणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकांवर पोलिसांत गुन्हे नोंदवितात.

"सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट अपलोड करू नये."- महेंद्र वाघ, पोलिस निरीक्षक, कुरखेडा.

"सध्याच्या तरुणाईसाठी सोशल मीडिया ही अत्यावश्यक बाब बनली आहे. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत, हे दाखविण्याच्या मानसिकतेतून असे प्रकार होत आहेत. मात्र, सोशल मीडियाचा वापर कमी केला पाहिजे."- डॉ. सचिन हेमके, मानसिक रोगतज्ज्ञ.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाArrestअटकGadchiroliगडचिरोली