शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या जिल्ह्यातील ८ जणांवर गुन्हे दाखल; आक्षेपार्ह पोस्ट करणे पडेल महागात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:16 IST

वापर काळजीपूर्वक हवा : नागपूर दंगलीनंतर सायबर सेलची करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून मोठी दंगल झाली होती. ही दंगल होण्यामागे सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्ट कारणीभूत ठरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे राज्यभरातील पोलिसांनी आता सोशल मीडियावरील पोस्टवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या जवळपास ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोष सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलद्वारे फेसबुक, व्हॉटसअॅप द्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वादग्रस्त पोस्ट आढळल्यास लगेच ती डिलीट केली जात आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात इन्स्टाग्राम, फेसबूक व द्विटरचा उपयोग करणाऱ्या युवकांची संख्या अलिकडे बरीच वाढली आहे. त्यामुळे युवकांनी सावधगिरी बाळगत याचा वापर करणे गरजेचे आहे.

हातात शस्त्रे घेऊन फोटो, रील्स होतात अपलोडसोशल मीडियावर तरुण अॅक्टिव्ह झाले आहेत. अनेकजण हातात खंजर, तलवार आणि देशी कट्टे घेऊन फोटो आणि रूल्स तयार करतात. त्यानंतर एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे या रील्स सोशल मीडियावर टाकण्यात येतात. अशा प्रकारे त्या त्या भागात आपली किती दहशत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येतो; परंतु पोलिसांनी आता अशा प्रकारचे दहशतीचे व्हिडीओ आणि रील्स टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कुरखेडात पोलिसांनी दिली होती समजसोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या कुरखेडा शहरातील युवकांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी समज दिली होती. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला.

१९ इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंटची तपासणीसोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने आतापर्यंत जवळपास १९ इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊंटवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याचे उघडकीस आले असून त्याची तपासणी केली जात आहे. या सर्व पोस्ट टाकणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकांवर पोलिसांत गुन्हे नोंदवितात.

"सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट अपलोड करू नये."- महेंद्र वाघ, पोलिस निरीक्षक, कुरखेडा.

"सध्याच्या तरुणाईसाठी सोशल मीडिया ही अत्यावश्यक बाब बनली आहे. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत, हे दाखविण्याच्या मानसिकतेतून असे प्रकार होत आहेत. मात्र, सोशल मीडियाचा वापर कमी केला पाहिजे."- डॉ. सचिन हेमके, मानसिक रोगतज्ज्ञ.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाArrestअटकGadchiroliगडचिरोली