शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

हस्तांतरणाचे परिपत्रक रद्द करा

By admin | Updated: July 5, 2014 23:36 IST

जिल्ह्यातील ४७ हजार हेक्टर वनक्षेत्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरी करण्याचे निर्देश वनविभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून दिले आहेत. या परिपत्रकामुळे जंगल कामगार सहकारी संस्था

४७ हजार हेक्टर वनक्षेत्र : जंगल कामगार संघाचे शिष्टमंडळ वनमंत्र्यांना भेटलेगडचिरोली : जिल्ह्यातील ४७ हजार हेक्टर वनक्षेत्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरी करण्याचे निर्देश वनविभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून दिले आहेत. या परिपत्रकामुळे जंगल कामगार सहकारी संस्था संकटात सापडल्या असून याबाबत जिल्हा जंगल कामगार संघाचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने वनमंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन सदर परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे. सदर परिपत्रकामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार संस्थांच्या सभादसदांवर उपासमारीचे संकट येण्याची शक्यता आहे.सदर परिपत्रकामुळे जंगल कामगार संस्थावर अवलंबून असलेल्या आदिवासी गोरगरीब सभासदांवर उपासमारीची वेळ आली आहे. गडचिरोली प्रादेशिक वनवृत्त, नागपूर व यवतमाळ प्रादेशिक वनवृत्तातील जंगल नवविकास महामंडळाला हस्तांतरीत करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. जंगल कामगार संस्थांच्या सभासदांना ठरवून दिलेल्या कायक्षेत्रात रोजगार मिळते. गेल्या अनेक वर्षापासून जंगल कामगार संस्था योग्य प्रकारे काम करीत आहे. संस्थेमार्फत सुरू असणारे काम सुरळीत असतांना शासनाने परिपत्रक काढून मजुरांचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य वनमजूर व जंगल कामगार संस्थांच्या सभासदांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जंगल कामगार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांची भेट घेऊन सदर परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली व जंगल कामगार संस्थेच्या अनेक समस्या निदर्शनास आणून दिल्या. वनमंत्र्यांनी परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात राज्य जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष वासुदेवशहा टेकाम, राज्य संघाचे उपाध्यक्ष हरीराम वरखडे, जिल्हा जंगल कामगार संघाचे अध्यक्ष पूर्णचंद्रराय सिडाम, राज्य संघाचे संचालक घनश्याम मडावी, संचालक राजेश कटरे, जिल्हा संघाचे प्रभारी सचिव एम. झेड. जांभुळकर, जिल्हा संघाचे संचालक सू. लू. उसेंडी, भाडभिडी जंकासचे सचिव तथा प्रभारी पर्यवेक्षक एम. डी. मेश्राम आदींचा समावेश होता. जिल्ह्यात जंगल कामगार संस्थेशी अनेक सभासद जुळले असून सभासदांमार्फत जंगल कटाईचे काम केले जाते. परंतु शासनाने परिपत्रक काढल्याने कामगारांवर अन्याय झाला आहे.