शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

हस्तांतरणाचे परिपत्रक रद्द करा

By admin | Updated: July 5, 2014 23:36 IST

जिल्ह्यातील ४७ हजार हेक्टर वनक्षेत्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरी करण्याचे निर्देश वनविभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून दिले आहेत. या परिपत्रकामुळे जंगल कामगार सहकारी संस्था

४७ हजार हेक्टर वनक्षेत्र : जंगल कामगार संघाचे शिष्टमंडळ वनमंत्र्यांना भेटलेगडचिरोली : जिल्ह्यातील ४७ हजार हेक्टर वनक्षेत्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरी करण्याचे निर्देश वनविभागाने नुकतेच एक परिपत्रक काढून दिले आहेत. या परिपत्रकामुळे जंगल कामगार सहकारी संस्था संकटात सापडल्या असून याबाबत जिल्हा जंगल कामगार संघाचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने वनमंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन सदर परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे. सदर परिपत्रकामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार संस्थांच्या सभादसदांवर उपासमारीचे संकट येण्याची शक्यता आहे.सदर परिपत्रकामुळे जंगल कामगार संस्थावर अवलंबून असलेल्या आदिवासी गोरगरीब सभासदांवर उपासमारीची वेळ आली आहे. गडचिरोली प्रादेशिक वनवृत्त, नागपूर व यवतमाळ प्रादेशिक वनवृत्तातील जंगल नवविकास महामंडळाला हस्तांतरीत करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. जंगल कामगार संस्थांच्या सभासदांना ठरवून दिलेल्या कायक्षेत्रात रोजगार मिळते. गेल्या अनेक वर्षापासून जंगल कामगार संस्था योग्य प्रकारे काम करीत आहे. संस्थेमार्फत सुरू असणारे काम सुरळीत असतांना शासनाने परिपत्रक काढून मजुरांचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य वनमजूर व जंगल कामगार संस्थांच्या सभासदांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जंगल कामगार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांची भेट घेऊन सदर परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली व जंगल कामगार संस्थेच्या अनेक समस्या निदर्शनास आणून दिल्या. वनमंत्र्यांनी परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात राज्य जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष वासुदेवशहा टेकाम, राज्य संघाचे उपाध्यक्ष हरीराम वरखडे, जिल्हा जंगल कामगार संघाचे अध्यक्ष पूर्णचंद्रराय सिडाम, राज्य संघाचे संचालक घनश्याम मडावी, संचालक राजेश कटरे, जिल्हा संघाचे प्रभारी सचिव एम. झेड. जांभुळकर, जिल्हा संघाचे संचालक सू. लू. उसेंडी, भाडभिडी जंकासचे सचिव तथा प्रभारी पर्यवेक्षक एम. डी. मेश्राम आदींचा समावेश होता. जिल्ह्यात जंगल कामगार संस्थेशी अनेक सभासद जुळले असून सभासदांमार्फत जंगल कटाईचे काम केले जाते. परंतु शासनाने परिपत्रक काढल्याने कामगारांवर अन्याय झाला आहे.