शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शिक्षकपदी नियुक्ती करून बेरोजगारांच्या आशेवर फेरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:51 IST

पात्रताधारकांमध्ये रोष : सुशिक्षितांना संधी देण्याची मागणी

प्रदीप बोडणेलोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदासाठी पात्र उमेदवार आहेत. असे असतानाही पेसा क्षेत्रात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सुशिक्षित बेरोजगारांऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना डावलून सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती का केली जात आहे, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे.

जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षण भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सरकारला पात्र उमेदवारांची शिक्षक भरती करता येत नाही. यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

पेसा क्षेत्रातील सर्व पंचायत समितीअंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्तीपत्रही पाठविलेले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच ३० ते ४० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. सर्व शिक्षकांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे. त्यांच्याकडून आता अध्यापनाचे कार्य उत्तम प्रकारे होईल काय, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे. सुशिक्षितांकडून अर्ज मागविले जात असले तरी नियुक्ती केव्हा होणार, असा प्रश्नही आहे.

सुशिक्षित बेरोजगार म्हणतात...."पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांची भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने तात्पुरत्या स्वरुपात सेवानिवृत्ती शिक्षकांची नियुक्ती म्हणजे पोट भरलेल्या लोकांना पुन्हा अन्न वाढण्यासारखे आहे. याच कारणामुळे बेरोजगारीची संख्या वाढत आहे."- पुनीत बावनकर, वैरागड

"जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असताना बेरोजगार तरुणांना रोजगार न देता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करणे म्हणजे बेरोजगारांवर अन्याय आहे. अटी शिथिल करून सुशिक्षितांना संधी द्यावी." - ज्योत्स्ना बोडणे, वैरागड

"सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच निवृत्तीवेतन मिळत असताना पुन्हा मानधन करणे चुकीचे देऊन नियुक्त्ती आहे. सेवानिवृत्त शिक्षक सेवाभाव ठेवून विद्यादानाचे काम मोफत करत असतील तर आमची काही अडचण नाही."- अंकित बोधनकर, वैरागड

"सेवानिवृत्त शिक्षकांना तालुक्यापासून २० ते ३० किलोमीटर अंतरावरील गावांत नियुक्त केले तर ये-जा करू शकत नाही. सेवानिवृत्त काही शिक्षकांना आजार असतात. त्यामुळे ते कुटुंबापासून दूर राहू शकत नाहीत."- चंदू उंदीरवाडे, वैरागड 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGadchiroliगडचिरोली