शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शिक्षकपदी नियुक्ती करून बेरोजगारांच्या आशेवर फेरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:51 IST

पात्रताधारकांमध्ये रोष : सुशिक्षितांना संधी देण्याची मागणी

प्रदीप बोडणेलोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदासाठी पात्र उमेदवार आहेत. असे असतानाही पेसा क्षेत्रात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सुशिक्षित बेरोजगारांऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना डावलून सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती का केली जात आहे, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे.

जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षण भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सरकारला पात्र उमेदवारांची शिक्षक भरती करता येत नाही. यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

पेसा क्षेत्रातील सर्व पंचायत समितीअंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्तीपत्रही पाठविलेले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच ३० ते ४० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. सर्व शिक्षकांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे. त्यांच्याकडून आता अध्यापनाचे कार्य उत्तम प्रकारे होईल काय, असा सवाल सुशिक्षित बेरोजगारांचा आहे. सुशिक्षितांकडून अर्ज मागविले जात असले तरी नियुक्ती केव्हा होणार, असा प्रश्नही आहे.

सुशिक्षित बेरोजगार म्हणतात...."पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांची भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने तात्पुरत्या स्वरुपात सेवानिवृत्ती शिक्षकांची नियुक्ती म्हणजे पोट भरलेल्या लोकांना पुन्हा अन्न वाढण्यासारखे आहे. याच कारणामुळे बेरोजगारीची संख्या वाढत आहे."- पुनीत बावनकर, वैरागड

"जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असताना बेरोजगार तरुणांना रोजगार न देता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करणे म्हणजे बेरोजगारांवर अन्याय आहे. अटी शिथिल करून सुशिक्षितांना संधी द्यावी." - ज्योत्स्ना बोडणे, वैरागड

"सेवानिवृत्त शिक्षकांना आधीच निवृत्तीवेतन मिळत असताना पुन्हा मानधन करणे चुकीचे देऊन नियुक्त्ती आहे. सेवानिवृत्त शिक्षक सेवाभाव ठेवून विद्यादानाचे काम मोफत करत असतील तर आमची काही अडचण नाही."- अंकित बोधनकर, वैरागड

"सेवानिवृत्त शिक्षकांना तालुक्यापासून २० ते ३० किलोमीटर अंतरावरील गावांत नियुक्त केले तर ये-जा करू शकत नाही. सेवानिवृत्त काही शिक्षकांना आजार असतात. त्यामुळे ते कुटुंबापासून दूर राहू शकत नाहीत."- चंदू उंदीरवाडे, वैरागड 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGadchiroliगडचिरोली