शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

धगधगत नष्ट होतेय भामरागड तालुक्यातील जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:42 IST

जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ताडगाव वनपरिक्षेत्र; वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही जंगलातून गायब

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे. पण अशा परिस्थितीतही संबंधित जंगलाचे रक्षणकर्ते असणारे वन अधिकारी किंवा कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे संतापजनक चित्र पहायला मिळत आहे.भामरागड वनविभागाअंतर्गत येणाºया ताडगाव वनपरिक्षेत्रातील काही भागात फेरफटका मारला असता वनसंपत्तीचा होत असलेला हा ºहास उघड्या डोळ्यांनी पहायला मिळतो. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या जंगलातील शेकडो झाडांची कत्तल झाली आहे. झाडाखालील पालापाचोळ्याला लागलेल्या आगीने आतापर्यंत कितीतरी जंगल आपल्या कवेत घेतले आहे. पण या भागात आग नियंत्रित ठेवण्यासाठी ना फायर लाईन दिसून येते, ना फायर ब्लोअर घेऊन आग विझविणारे वनरक्षक दिसून येतात. एकूणच हे जंगल बेवारस झाल्यासारखी स्थिती पहायला मिळत आहे.ताडगाव ते जिंजगाव या ११ किलोमीटरच्या अंतरात अनेक ठिकाणी झाडे बुंध्यापासून कापलेली आणि काही ठिकाणी झाडांना बुंध्यापासून पेटवून दिल्याचे चित्र पहायला मिळाले. या आडमार्गावर त्या मार्गावरील गावकऱ्यांशिवाय कोणीही फिरकत नाही. रस्ता खराब असल्यामुळे अधिकारी किंवा वन कर्मचारीही जात नसावे. त्यामुळेच जंगलाच्या कायद्यांना न जुमानता सर्रास जंगलाची कत्तल केली जात आहे.जंगल नष्ट करून करायची शेती?गावापासून काही अंतरावरील जंगल दिवसागणिक विरळ होत आहे. अनेक झाडांना बुंध्याजवळ कुºहाडीने घाव घालून ठेवले जाते. नंतर त्याच ठिकाणी ते झाड पोटवून दिले जाते. जंगलात पेटलेल्या वणव्यामुळे झाडाला आग लागली असेल असे प्रथमदर्शन भासते. परंतू जवळ जाऊन पाहिल्यास पेटलेल्या अनेक झाडांच्या सभोवताल वणवा पेटल्याचे लक्षणही दिसत नाही. असे असताना झाड पेटते कसे? हा प्रश्न कायम राहतो. गावालगतचे लोक एकतर सरपण म्हणून वापरण्यासाठी झाडे कापून पुरावा नष्ट करण्यासाठी बुंधा पेटवून देत असावेत.दुसरी शक्यता म्हणजे गावातील शेतकºयांना शेतीसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे हळूहळू जंगल नष्ट करून त्या ठिकाणी शेती करण्यासाठी हे सर्व उपद्व्याप सुरू असण्याची शक्यता दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. काहीही असले तरी हा प्रकार गंभीर असून वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी त्याकडे डोळेझाकपणा करत असल्याने हे त्यापेक्षाही गंभीर मानले जात आहे.अधिकारी निरूत्तरयासंदर्भात ताडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.के. तामाणे यांना विचारले असता, राऊंड आॅफिसरची जंगलात चक्कर नेहमी असले असे ते म्हणाले. मग जंगल नष्ट करण्याचा हा प्रकार दिसला नाही का, असे विचारले असता त्याबाबत ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांची ही चुप्पी बरेच काही सांगून जाते. केवळ काही मर्यादित भागात फेरफटका मारल्यानंतर हे भयावह चित्र दिसले, अजून आतमधील जंगलात काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.

टॅग्स :forestजंगल