शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

धगधगत नष्ट होतेय भामरागड तालुक्यातील जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:42 IST

जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ताडगाव वनपरिक्षेत्र; वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही जंगलातून गायब

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे. पण अशा परिस्थितीतही संबंधित जंगलाचे रक्षणकर्ते असणारे वन अधिकारी किंवा कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे संतापजनक चित्र पहायला मिळत आहे.भामरागड वनविभागाअंतर्गत येणाºया ताडगाव वनपरिक्षेत्रातील काही भागात फेरफटका मारला असता वनसंपत्तीचा होत असलेला हा ºहास उघड्या डोळ्यांनी पहायला मिळतो. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या जंगलातील शेकडो झाडांची कत्तल झाली आहे. झाडाखालील पालापाचोळ्याला लागलेल्या आगीने आतापर्यंत कितीतरी जंगल आपल्या कवेत घेतले आहे. पण या भागात आग नियंत्रित ठेवण्यासाठी ना फायर लाईन दिसून येते, ना फायर ब्लोअर घेऊन आग विझविणारे वनरक्षक दिसून येतात. एकूणच हे जंगल बेवारस झाल्यासारखी स्थिती पहायला मिळत आहे.ताडगाव ते जिंजगाव या ११ किलोमीटरच्या अंतरात अनेक ठिकाणी झाडे बुंध्यापासून कापलेली आणि काही ठिकाणी झाडांना बुंध्यापासून पेटवून दिल्याचे चित्र पहायला मिळाले. या आडमार्गावर त्या मार्गावरील गावकऱ्यांशिवाय कोणीही फिरकत नाही. रस्ता खराब असल्यामुळे अधिकारी किंवा वन कर्मचारीही जात नसावे. त्यामुळेच जंगलाच्या कायद्यांना न जुमानता सर्रास जंगलाची कत्तल केली जात आहे.जंगल नष्ट करून करायची शेती?गावापासून काही अंतरावरील जंगल दिवसागणिक विरळ होत आहे. अनेक झाडांना बुंध्याजवळ कुºहाडीने घाव घालून ठेवले जाते. नंतर त्याच ठिकाणी ते झाड पोटवून दिले जाते. जंगलात पेटलेल्या वणव्यामुळे झाडाला आग लागली असेल असे प्रथमदर्शन भासते. परंतू जवळ जाऊन पाहिल्यास पेटलेल्या अनेक झाडांच्या सभोवताल वणवा पेटल्याचे लक्षणही दिसत नाही. असे असताना झाड पेटते कसे? हा प्रश्न कायम राहतो. गावालगतचे लोक एकतर सरपण म्हणून वापरण्यासाठी झाडे कापून पुरावा नष्ट करण्यासाठी बुंधा पेटवून देत असावेत.दुसरी शक्यता म्हणजे गावातील शेतकºयांना शेतीसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे हळूहळू जंगल नष्ट करून त्या ठिकाणी शेती करण्यासाठी हे सर्व उपद्व्याप सुरू असण्याची शक्यता दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. काहीही असले तरी हा प्रकार गंभीर असून वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी त्याकडे डोळेझाकपणा करत असल्याने हे त्यापेक्षाही गंभीर मानले जात आहे.अधिकारी निरूत्तरयासंदर्भात ताडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.के. तामाणे यांना विचारले असता, राऊंड आॅफिसरची जंगलात चक्कर नेहमी असले असे ते म्हणाले. मग जंगल नष्ट करण्याचा हा प्रकार दिसला नाही का, असे विचारले असता त्याबाबत ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांची ही चुप्पी बरेच काही सांगून जाते. केवळ काही मर्यादित भागात फेरफटका मारल्यानंतर हे भयावह चित्र दिसले, अजून आतमधील जंगलात काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.

टॅग्स :forestजंगल