शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बंधाऱ्याने नदीकाठाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:58 IST

सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.

ठळक मुद्दे४० लाखांचा खर्च पाण्यात : १० वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने झाले होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी शिवकालीन बंधारे बांधले जात होते. हा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी झाला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील काही नदी, नाल्यांवर शिवकालीन बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर बंधारे प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात आले होते. मात्र ते चुकीच्या पद्धतीने बांधल्या गेल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. सदर बंधारे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने या बंधाºयामुळे एक दिवस नदीचे संपूर्ण काठच सपाट होण्याची भीती आहे.कुरखेडा तालुक्यातील कढोली गावातून वाहणाºया सती नदीच्या पात्रात सन २००८-०९ या वर्षांत ४० लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधल्याने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने बंधारा फुटला. शिवकालीन बंधारा हा जमिनीच्या भूगर्भात बांधला जातो, पण हा पंधारा नदी पात्राच्या तीन फूट उंच बांधण्यात आला. शिवकालीन बंधाºयाची सिमेंट भिंत नदीपात्राच्या समांतर असते. मात्र सती नदीवरचा बंधारा तीन फूट उंच बांधण्यात आला. बंधारा तर पहिल्याच वर्षी वाहून गेला. मात्र त्याचे अवशेष अजूनही नदीपात्रात आहेत.नदीचे पाणी बंधाऱ्याच्या या अवशेषांना आपटते व परत नदीकाठावर येते. त्यामुळे नदीकाठ खचत आहे. मागील १० वर्षांत बंधाºयापासून काही दूर अंतरावरील नदीकाठ खचले आहे. जवळपास आठ ते दहा एकर जमिनीचे नुकसान झाले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. या योजनेवर झालेला ४० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.बंधारा नष्ट कराबंधारा नष्ट झाला असला तरी या बंधाऱ्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. या अवशेषांना नदीचे पाणी आदळून ते नदीकाठालाही आदळते. सतत जवळपास चार महिने नदीकाठाला पाणी आदळत असल्याने नदीकाठ खचत चालला आहे. आठ ते दहा एकरातील शेती नष्ट झाली आहे. भविष्यात पुन्हा शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाºयाचे अवशेष नष्ट करावे, अशी मागणी आहे.