शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बंधाऱ्याने नदीकाठाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:58 IST

सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.

ठळक मुद्दे४० लाखांचा खर्च पाण्यात : १० वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने झाले होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी शिवकालीन बंधारे बांधले जात होते. हा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी झाला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील काही नदी, नाल्यांवर शिवकालीन बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर बंधारे प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात आले होते. मात्र ते चुकीच्या पद्धतीने बांधल्या गेल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. सदर बंधारे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने या बंधाºयामुळे एक दिवस नदीचे संपूर्ण काठच सपाट होण्याची भीती आहे.कुरखेडा तालुक्यातील कढोली गावातून वाहणाºया सती नदीच्या पात्रात सन २००८-०९ या वर्षांत ४० लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधल्याने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने बंधारा फुटला. शिवकालीन बंधारा हा जमिनीच्या भूगर्भात बांधला जातो, पण हा पंधारा नदी पात्राच्या तीन फूट उंच बांधण्यात आला. शिवकालीन बंधाºयाची सिमेंट भिंत नदीपात्राच्या समांतर असते. मात्र सती नदीवरचा बंधारा तीन फूट उंच बांधण्यात आला. बंधारा तर पहिल्याच वर्षी वाहून गेला. मात्र त्याचे अवशेष अजूनही नदीपात्रात आहेत.नदीचे पाणी बंधाऱ्याच्या या अवशेषांना आपटते व परत नदीकाठावर येते. त्यामुळे नदीकाठ खचत आहे. मागील १० वर्षांत बंधाºयापासून काही दूर अंतरावरील नदीकाठ खचले आहे. जवळपास आठ ते दहा एकर जमिनीचे नुकसान झाले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. या योजनेवर झालेला ४० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.बंधारा नष्ट कराबंधारा नष्ट झाला असला तरी या बंधाऱ्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. या अवशेषांना नदीचे पाणी आदळून ते नदीकाठालाही आदळते. सतत जवळपास चार महिने नदीकाठाला पाणी आदळत असल्याने नदीकाठ खचत चालला आहे. आठ ते दहा एकरातील शेती नष्ट झाली आहे. भविष्यात पुन्हा शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाºयाचे अवशेष नष्ट करावे, अशी मागणी आहे.