शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

बंधाऱ्याने जलसंकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:00 IST

उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने वैलोचना नदीवर सिमेंट बॅगचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देवैरागड ग्रामपंचायतीचा उपक्रम : वैलोचना नदीपात्रात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने वैलोचना नदीवर सिमेंट बॅगचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.वैरागड गावाला वैलोचना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वैलोचना नदीवर पाणीपुरवठा योजना बांधण्यात आली आहे. या पाणीपुरवठा योजनेजवळच शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा अपूर्ण असल्याने या बंधाऱ्यात पाणी राहत नाही. परिणामी मार्च, एप्रिलनंतर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी पाऊस कमी झाला असल्याने पाणीटंचाईचे संकट फेब्रुवारी महिन्यातच ओढवणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने जुन्या शिवकालीन बंधाऱ्याला जोडून सिमेंटच्या बॅगचा बंधारा बांधला आहे. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडून काही दूर अंतरापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीपर्यंत पाणी राहणार आहे.वैरागड परिसरातील शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. धानपिकासाठी नदीचे पाणी वापरले जाते. परिणामी नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी कमी पडते. परिणामी वैरागडला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पिण्यासाठी पाण्याचा वापर करणे याला प्राधान्य देत शेतकऱ्यांनी नदीचे पाणी धानपिकासाठी वापरू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.पाणीटंचाई निवारण्यासाठी वैरागड ग्रामपंचायतीने योजलेल्या उपायाची प्रशंसा केली जात आहे. इरतही गावांनी याचे अनुकरण करावे.नवीन पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यातवैरागड हे आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. वैरागडला ऐतिहासिक दर्जा आहे. दिवसेंदिवस वैरागड गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढत चालली आहे. जुनी पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासूनची आहे. या योजनेचे पाणी पुरत नसल्याने नवीन पाणीपुरवठा योजना वैलोचना नदीवरच गोरजाई डोहाच्या खालील बाजूस मंजूर करण्यात आली आहे. मात्र या योजनेचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे वैरागडवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषद सदस्यांनी सदर योजनेसाठी पाठपुरावा करून नवीन योजना बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे. नवीन योजना झाल्यास पाणीटंचाई कमी होईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई