शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याने जलसंकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:00 IST

उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने वैलोचना नदीवर सिमेंट बॅगचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देवैरागड ग्रामपंचायतीचा उपक्रम : वैलोचना नदीपात्रात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने वैलोचना नदीवर सिमेंट बॅगचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.वैरागड गावाला वैलोचना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वैलोचना नदीवर पाणीपुरवठा योजना बांधण्यात आली आहे. या पाणीपुरवठा योजनेजवळच शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा अपूर्ण असल्याने या बंधाऱ्यात पाणी राहत नाही. परिणामी मार्च, एप्रिलनंतर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होऊन पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी पाऊस कमी झाला असल्याने पाणीटंचाईचे संकट फेब्रुवारी महिन्यातच ओढवणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने जुन्या शिवकालीन बंधाऱ्याला जोडून सिमेंटच्या बॅगचा बंधारा बांधला आहे. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडून काही दूर अंतरापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीपर्यंत पाणी राहणार आहे.वैरागड परिसरातील शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. धानपिकासाठी नदीचे पाणी वापरले जाते. परिणामी नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी कमी पडते. परिणामी वैरागडला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पिण्यासाठी पाण्याचा वापर करणे याला प्राधान्य देत शेतकऱ्यांनी नदीचे पाणी धानपिकासाठी वापरू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.पाणीटंचाई निवारण्यासाठी वैरागड ग्रामपंचायतीने योजलेल्या उपायाची प्रशंसा केली जात आहे. इरतही गावांनी याचे अनुकरण करावे.नवीन पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यातवैरागड हे आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. वैरागडला ऐतिहासिक दर्जा आहे. दिवसेंदिवस वैरागड गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढत चालली आहे. जुनी पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासूनची आहे. या योजनेचे पाणी पुरत नसल्याने नवीन पाणीपुरवठा योजना वैलोचना नदीवरच गोरजाई डोहाच्या खालील बाजूस मंजूर करण्यात आली आहे. मात्र या योजनेचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे वैरागडवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषद सदस्यांनी सदर योजनेसाठी पाठपुरावा करून नवीन योजना बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे. नवीन योजना झाल्यास पाणीटंचाई कमी होईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई