शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: January 24, 2015 00:52 IST

भारत संचार निगम लिमिटेडची सेवा शहरापासून गावापर्यंत पोहोचली असली तरी मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

चामोर्शी : भारत संचार निगम लिमिटेडची सेवा शहरापासून गावापर्यंत पोहोचली असली तरी मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक टॉवर बीएसएनएलचे आहेत. प्रत्येक तालुक्यात पाच ते सहा टॉवर असल्याने नागरिकांनी बीएसएनएलचे सीम घेतले आहेत. मात्र बहुतांश टॉवरमधील बॅटऱ्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होताच टॉवरचे काम करणे बंद होते. त्यामुळे या कालावधीत परिसरातील मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवितात. गडचिरोली जिल्ह्यात विद्युत खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा फटका मोबाईलधारकांना बसत आहे. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा लाईन व्यस्त असल्याचे सांगितले जाते. केंद्र शासनाने दुर्गम भागात २६ टॉवर उभारण्याला परवानगी दिली होती. मात्र सदर टॉवरचे कामही पूर्ण झाले नाही. टॉवरच्या देखभालीकडे बीएसएनएल कर्मचाऱ्यांची दुर्लक्ष होत असल्याने टॉवर व्यवस्थित काम करीत नाही. तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा बीएसएनएलकडे टॉवरबाबत तक्रार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याने कव्हरेजची समस्या बहुतांश गावांमध्ये कायम आहे. (शहर प्रतिनिधी)