शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बीएसएनएलची सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: January 24, 2015 00:52 IST

भारत संचार निगम लिमिटेडची सेवा शहरापासून गावापर्यंत पोहोचली असली तरी मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

चामोर्शी : भारत संचार निगम लिमिटेडची सेवा शहरापासून गावापर्यंत पोहोचली असली तरी मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक टॉवर बीएसएनएलचे आहेत. प्रत्येक तालुक्यात पाच ते सहा टॉवर असल्याने नागरिकांनी बीएसएनएलचे सीम घेतले आहेत. मात्र बहुतांश टॉवरमधील बॅटऱ्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होताच टॉवरचे काम करणे बंद होते. त्यामुळे या कालावधीत परिसरातील मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवितात. गडचिरोली जिल्ह्यात विद्युत खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा फटका मोबाईलधारकांना बसत आहे. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा लाईन व्यस्त असल्याचे सांगितले जाते. केंद्र शासनाने दुर्गम भागात २६ टॉवर उभारण्याला परवानगी दिली होती. मात्र सदर टॉवरचे कामही पूर्ण झाले नाही. टॉवरच्या देखभालीकडे बीएसएनएल कर्मचाऱ्यांची दुर्लक्ष होत असल्याने टॉवर व्यवस्थित काम करीत नाही. तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा बीएसएनएलकडे टॉवरबाबत तक्रार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याने कव्हरेजची समस्या बहुतांश गावांमध्ये कायम आहे. (शहर प्रतिनिधी)