शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

वीज पुरवठा खंडित होताच् बीएसएनएलची सेवा पडते ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:56 IST

ग्राहक कमालीचे त्रस्त : फोन लागत नाही, आवाजही येत नाही

लिकेश अंबादे लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची शहरांमध्ये बीएसएनएलचे दोन टॉवर आहेत. त्यापैकी तहसील कार्यालय परिसरमधील बीएसएनएल टॉवरची सेवा नेहमीच कुचकामी ठरत आहे. या परिसरात शासकीय व प्रशासकीय कार्यालय असून ग्राहकांना बीएसएनएल सेवा वेळेवर मिळत नसल्याने अडथळा निर्माण होत आहे. तालुक्यातील विद्युत सेवा ठप्प झाली की बीएसएनएल सेवासुद्धा ठप्प पडत आहे. फोन लागत नाही लागला तर आवाज येत नाही अशा अडचणी निर्माण होत आहेत.

कोरची तालुक्यात अनेक ठिकाणी बीएसएनएलच्या थ्री-जीचे टॉवर उभारले आहेत; परंतु कोरची तहसील, मसेली, कोटगुल, बेतकाठी या गावातील विद्युत खंडित होताच ग्राहकांच्या मोबाईलमध्ये इंटरनेटही चालत नाही. महागडे रिचार्ज करूनही बीएसएनएल सेवा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. काही ग्राहक बीएसएनएल सेवा बंद करून इतर कंपन्यांची सेवा सुरू करत आहेत.

कोरची शहरातील तहसील ऑफिस परिसरात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर निर्भर अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत. त्यामध्ये पोलिस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, गटसाधन केंद्र, नगरपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, आयटीआय, शासकीय आश्रमशाळा, वनश्री महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीएसएनएल टॉवरची सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

इतर कंपन्यांकडे वळताहेत ग्राहकबीएसएनएल ही भारत सरकारची कंपनी आहे. अगदी सुरुवातीला याच कंपनीचे टॉवर कोरची तालुक्यात असल्याने नागरिकांनी बीएसएनएलचे सीम खरेदी केले. आता मात्र खासगी कंपन्यांनी तालुक्यासह ग्रामीण भागात टॉवर उभारले आहेत. खासगी कंपन्यांची सेवा सुरू होताच नागरिक या कंपन्यांचे सीम खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोरची शहरात सेवेचा दर्जा अतिशय सुमारतालुक्यातील बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. या गावांमध्ये मोबाइल कव्हरेजच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केल्यास बीएसएनएलकडून जंगलाचे कारण दिले जाते. मात्र कोरची या तालुकास्थळीसुद्धा सेवा अतिशय खराब आहे. इंटरनेटची गती अतिशय कमी असल्याने बीएसएनएलप्रति ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

"वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे बॅटऱ्यांमध्ये बिघाड निर्माण होत आहे. त्यामुळे बीएसएनएल नेटवर्कची समस्या होते. नवीन बॅटऱ्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. नवीन बॅटऱ्या लागल्यानंतर ही समस्या लवकरच सुटेल." - रवी आंबिलकर, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, बीएसएनएल

टॅग्स :BSNLबीएसएनएलGadchiroliगडचिरोली