शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीशकालीन वैभव हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:42 IST

ब्रिटिशांच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अशी सिरोंचाची ओळख होती. जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण येथूनच चालायचे. पण आज सिरोंचा एकाकी पडले आहे. त्यावेळचे पुरातन अवशेषही नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.

ठळक मुद्देसिरोंचाची दुरवस्था : तीन राज्यांच्या सीमेवरील तालुक्याची वाताहात

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : ब्रिटिशांच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अशी सिरोंचाची ओळख होती. जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण येथूनच चालायचे. पण आज सिरोंचा एकाकी पडले आहे. त्यावेळचे पुरातन अवशेषही नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.ब्रिटीश कारकिर्दीत सिरोंचा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. येथील विश्रामगृह आजही त्याची साक्ष देते. या मुख्यालयातूनच संपूर्ण जिल्ह्याचे व्यवहार चालत होते. कलेक्टर येथूनच आपला रक्षकांचा ताफा घेऊन संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करित होते. यात आंध्रप्रदेश व मध्यप्रदेश (आताचे छत्तीसगड) या राज्याचा काही भाग समाविष्ट करून अप्पर गोदावरी जिल्हा निर्माण केला होता. म्हणूनच सिरोंचात आजही बहुतांश लोक तेलगू भाषिक आहेत. लागूनच असलेल्या मध्यप्रदेशाची हिंदी भाषाही त्यांना शिकावी लागली. मे १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आल्याने पुन्हा मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली. आता या तीनही भाषांचा संगम येथे पहायला मिळतो. पण आज हे सिरोंचा प्रत्येक बाबतीत उपेक्षितच आहे.बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने परराज्यात रोजगाराकरिता भटकंती करावी लागत आहे. हाताला काम नसल्याने वेटबिगारी करण्यास गेलेल्या काही युवकांची तेलंगणातील वरंगल येथून काही महिन्यांपूर्वी सुटका आणण्यात आली. ग्रामीण भागात आजही बिकट परिस्थिती आहे. सिरकोंडा ते झिंगानूर या रस्त्यावरील प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊन करावा लागतो. राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. कोटयवधी रूपये खर्च करूनही निजामाबाद ते जगदलपूर या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे उद्दीष्ट अद्यापही अपूर्णच आहे. इंद्रावती व प्राणहीता नद्यांवर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही.तालुक्यात आरोग्यसेवा देखील कुचकमी ठरत आहे. एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सोईसुविधा पूरेपुर नसल्याचे निदर्शनास येते. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या आरोग्य केंद्राची पाहणी करून सूचना केल्या. पण ग्रामीण रूग्णालयातील समस्याही सुटल्या नाही. वेळोवेळी औषधांचा तुरवडा जाणवत असतो. ज्यांची आर्थिक क्षमता आहे ते जवळच्या तेलंगणा राज्यात उपचाराकरिता जातात.शेतकºयांसाठी शेतीही बेभरवशाची झाली आहे. अनेक वेळा नुकसान सहन करावे लागले. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे देखील शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. मजुरीचे दर कमी असल्याने अनेक स्त्री व पुरूष तेलंगणात रोवणीच्या कामाकरिता स्थलांतर करतात. हे चित्र कधी बदलेल असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे.