शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

गडचिरोलीतील प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन वनरक्षकांचे मृतदेह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:57 IST

रविवारी सकाळी प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन बेपत्ता वनरक्षकांचे मृतदेह आज सोमवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान तेलंगणा हद्दीत सापडले असून तेलंगणा पोलिसांंनी ते ताब्यात घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारी सकाळी प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन बेपत्ता वनरक्षकांचे मृतदेह आज सोमवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान तेलंगणा हद्दीत सापडले असून तेलंगणा पोलिसांंनी ते ताब्यात घेतले आहेत.अशी आहे ही घटनाअहेरीपासून तीन किमी अंतरावरील वांगेपल्ली घाटावर प्राणहिता नदीच्या पात्रात नाव उलटल्याने तेलंगणातील दोन वन कर्मचारी पाण्यात बुडाले होते. नावेतील चौघांचे प्राण वाचले. सदर घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली होती.मुंजम बालकृष्णा रा. कागजनगर व सुरेश बानावत रा. केरझारी ता. आदिलाबाद (दोघेही तेलंगणाचे रहिवासी) अशी त्यांची नावे आहेत. वांगेपल्लीजवळ प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने नागरिकांना नावेतून प्रवास करावा लागतो. नदीपलीकडील तेलंगणावासीयांची ये-जा नावेनेच सुरू राहते.रविवारी सकाळी वांगेपल्ली येथील गंगा नामक नावचालक व त्याच्या साथीदाराने तेलंगणाला जाण्यासाठी नाव काढली असता तीन वन कर्मचारी व एक मेंढपाळ असे आणखी चौघे बसले. लहान असलेली नाव नदीपात्राच्या मध्यंतरी गेल्यानंतर अतीवजनामुळे पाण्यात बुडाली. नाव चालक, त्याचा सहायक, मेंढपाळ व एका वन कर्मचाऱ्याला पोहता येत असल्याने ते पाण्याबाहेर निघाले. मात्र दोन वनकर्मचाऱ्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले.घटनेनंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रविण डांगे, तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, तलाठी व्यंकटेश जल्लेवार, अहेरीचे माजी सरपंच रामेश्वर आत्राम यांच्या मार्गदर्शनात रविवारी दिवसभर शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र बेपत्ता असलेल्यांचा शोध लागला नाही. प्राणहिता नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे शोध घेताना अडचणी येत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात